HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेने बंद पाडला विमानतळाबाहेरचा टोलनाका

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाबाहेरील प्रवाशांना पार्किंगसाठी टोल आकारण्याविरोधात शिवसेनेने आंदोलन करत तो टोलनाकाच बंद पाडला आहे.

आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झाले होते. आजच्या आंदोलनाच्या आधी शिवसेनेनं जीव्हीके कंपनीच्या व्यवस्थापनाला या टोलवसुलीविषयी विचारणा केली होती. मात्र व्यवस्थापनाकडून कोणतही समाधानकारक उत्तर मिळालं नाही. त्यामुळं आजचं आंदोलन करावं लागंल असं शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब यांनी सांगितलं. तसच यापुढे ही टोलवसुली बंद झाली नाही तर विमानतळ बंद पाडू असा इशाराही शिवसेनेनं दिलाय. गेल्या काही वर्षांपासून प्रवाशांकडून टोल वसूल केला जातो. तो आता 130 रुपयांपर्यंत पोचलाय. त्यातून महिन्याला सुमारे 35 ते 40 लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचा अंदाज व्यक्त होतोय. ही टोलवसुली अनधिकृत असल्याचा सार्वत्रिक आरोप आहे. तसेच नाग्रीकांमध्येही या टोलवसुलीबाबत प्रचंड रोष आणि मनस्ताप आहे. तसेच विमानतळ नूतनीकरण करताना हटवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा मूळ जागी बसविण्यात यावा अशी मागणीही शिवसनेने केलीय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना आर्थिक मदत देणार

News Desk

…तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही !

News Desk

पालघरमध्ये मॉब लिंचिंगची घटनेप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा !

News Desk