HW News Marathi
महाराष्ट्र

हुंडा प्रथेविरोधात उपाययोजनेची गरज – संभाजी ब्रिगेड

पैठण – आपल्या लग्नासाठी हुंड्याचा भार वडिलांवर पडू नये म्हणून एखाद्या तरुणीने आत्महत्या करणे ही लाजिरवाणी गोष्ट असून यावर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांनी व्यक्त केले.

लातूरयेथील शीतल वायाळ या तरुणीने आपल्या लग्नाच्या हुंड्याचा भार वडिलांवर पडू नये, या कारणावरून आत्महत्या केल्याचे तिने लिहिलेल्या चिठ्ठीवरून स्पष्ट झाले. त्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर शीतल वायाळ हिला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी “हुंडा घेणार नाही, घेऊ देणार नाही’, अशी शपथ शहरातील तरुणांनी घेतली. जाधव म्हणाले, पुढील काळात कोणत्याही महिलेने आत्महत्या करू नये यासाठी हे पाऊल उचलले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी व कष्टकरी यांच्या मुला-मुलींसाठी सामुदायिक विवाह सोहळा व मुलांचा शैक्षणिक खर्च राजश्री शाहू महाराज जयंतीदिनी २६ जून रोजी संभाजी ब्रिगेड करणार आहे. प्रारंभीछत्रपती शिवरायांना अभिवादन करून शीतल वायाळ हिला श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या वेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ शेळके, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, ज्ञानेश्वर पठाडे, महेंद्र नरके, प्रमोद कोल्हे, नीलेश वावरे, परमेश्वर बर्डे, निवृत्ती काळे, विकास रोकडे, महेश पवार, भाऊसाहेब भुकेले, संदीप तांबे, अमोल भागवत, गणेश शिंदे, देविदास शिंदे, राजू बोंबले, धनंजय सूर्यवंशी आदी उपस्थितहोते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना न्याय मिळेल या अनुषंगाने राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार- डॉ. गोऱ्हे नीलम

News Desk

रथाची चाके कुठे अडकू नयेत म्हणून या शुभेच्छा!

News Desk

गोपीकिशन बाजोरियांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे ! – नाना पटोले

News Desk