HW News Marathi
महाराष्ट्र

२००९-१० च्या शेतक-यांनाही आता कर्जमाफीचा लाभ मिळणार

उत्तम बाबळे
मुंबई : राज्य सरकारने कर्जमाफीसाठी थकीत कर्जबाजारी असलेल्या शेतक-यांच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार आज गुरूवारी त्याविषयीचा शासन निर्णय राज्य सरकारने प्रसिध्द केला. तसेच २००९-१० वर्षी कजार्ची थकबाकी असलेल्या शेतक-यांनाही १० हजार रूपयाच्या आगाऊ उचल कजार्चा लाभ मिळणार आहे.

सुरुवातीला २०११-१२ साली कर्ज घेतलेल्या शेतक-यांना कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. मात्र या निकषात बदल करत त्याची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. त्या अनुषंगाने २००९-१० साली कर्ज घेतलेल्या शेतक-यांना कर्जमाफी देण्याच्या निकषात बदल करत त्याविषयीचा शासन निर्णय गुरूवारी प्रसिद्ध केला. त्याचबरोबर यावर्षीच्या थकीत कर्जदार शेतक-यांना १० हजार रूपयांची उचल देण्याविषयीचा निर्णय राज्य सरकारने घेत त्याची माहिती सर्व जिल्हा बँकाना कळविण्यात येणार असल्याचेही शासननिर्णयात सांगण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजब सरकारचे गजब फर्मान; म्हणे,कोंबड्यांचे पोस्टमार्टम करा

swarit

मग आडनाव बॅनर्जी असुदे किंवा ठाकरे, पवार ते आडवे करणारच, राणेंचा प्रहार

News Desk

चर्चा करायची नसेल तर आम्ही घरी जातो…फडणवीसांचा आघाडी सरकारवर हल्लाबोल

News Desk