HW News Marathi
महाराष्ट्र

ठाण्यात १०० रुपयांत १० वर्षे वायफाय!

ठाणे : सध्या सर्वत्र विनामूल्य वायफायचे पेव फुटले आहेत. ठाणे महापालिकेनेही त्यात पुढाकार घेतला आहे. केवळ १०० रुपयांत नावनोंदणी करून पालिका १० वर्षे ठाणेकरांना विनामूल्य वायफाय सेवा देणार आहे. शहरात टप्प्याटप्प्याने ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

महापालिकेकडे १00 रुपये शुल्क भरून नावनोंदणी करणाऱ्या ठाणेकरांना पुढील दहा वर्षांसाठी ८00 केबीपीएस वेगाने डेटाविनामूल्य वापरण्यास मिळणार आहे. यापेक्षा जास्त वेग हवा असल्यास वेगळे शुल्क भरावे लागणार आहे. तसेच महापालिकेच्या सर्व कार्यालयांना २0 एमबीपीएस वेगाने डेटा या सेवेअंतर्गत विनामूल्य पुरविला जाणार आहे. या योजनेतून महापालिकेस वर्षाकाठी ६१ लाखांचे उत्पन्न मिळेल, असा विश्वास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

माझ्या विरोधात ईडी, सीबीआयची नोटीस काढून दाखवा !

News Desk

#CoronaVirus : मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या दृष्टीने घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

swarit

मला पवार साहेबांबाबत असं बोलायचं नव्हतं, चंद्रकांत पाटलांचे त्या वक्तव्यावरून स्पष्टीकरण

News Desk
मुंबई

ड्रायव्हिंग लायसन्स आता कॉलेजातच मिळणार!

News Desk

पुणे : वाहन परवाना काढण्यासाठी आरटीओमध्ये रांगा लावणे किंवा एजंटचे पाया धरावे लागणे, आता थांबणार आहे. शिकाऊ वाहन परवाना (र्निं लायसन्स) देण्याचेअधिकार सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्राचार्याना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुंबईत नुकत्याचझालेल्या बैठकीत राज्याच्या मुख्य सचिवांनीयाबाबतचे आदेश दिले असून, ३१ ऑगस्टला याबाबतचे प्रारूप नियम प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यामुळे महाविद्यालयीन काळातच विद्यार्थ्यांना विनाकटकट वाहनपरवाने काढून घेता येणार आहेत.

शिकाऊ वाहन परवान्यासाठी सध्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतात. चाचणी देण्याच्या तारखेला आरटीओ कार्यालयात जावे लागते. त्या ठिकाणीवाहन निरीक्षकांकडून अर्जदाराची चाचणी घेण्यात येते. मुख्य सचिवांनी दिलेल्या आदेशानुसार हे अधिकार प्राचार्याना देण्यात येणार असून, त्यासाठी नियमांत सुधारणाहीकरण्यात येणार आहे. ३१ ऑगस्टला त्याचे प्रारूप प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील एक महिन्यात त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयामुळे प्राचार्यावरशैक्षणिक कामाशिवाय एका वेगळ्याच कामाची जबाबदारी येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाहन नोंदणी वितरकांकडेच

प्रवासी आणि मालवाहू वाहने वगळता दुचाकी आणि चारचाकी हलक्या मोटारी आदी वाहनांच्या नोंदणीचे काम आरटीओऐवजी संबंधित

वाहन वितरकांकडेच सोपविण्याचानिर्णयही घेण्यात आला आहे. त्यासाठी वाहन वितरकांना नोंदणी प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

Related posts

मानव कल्याणासाठी साऱ्याविश्वाला बुद्ध हवा -केंद्रियराज्यमंत्री रामदासआठवले

News Desk

विसर्जनानंतर स्वच्छतेसाठी दादर चौपाटीवर पर्यावरण प्रेमी एकटले

swarit

मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपत घोषणाबाजी

News Desk