HW News Marathi
महाराष्ट्र

ठाण्यात १०० रुपयांत १० वर्षे वायफाय!

ठाणे : सध्या सर्वत्र विनामूल्य वायफायचे पेव फुटले आहेत. ठाणे महापालिकेनेही त्यात पुढाकार घेतला आहे. केवळ १०० रुपयांत नावनोंदणी करून पालिका १० वर्षे ठाणेकरांना विनामूल्य वायफाय सेवा देणार आहे. शहरात टप्प्याटप्प्याने ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

महापालिकेकडे १00 रुपये शुल्क भरून नावनोंदणी करणाऱ्या ठाणेकरांना पुढील दहा वर्षांसाठी ८00 केबीपीएस वेगाने डेटाविनामूल्य वापरण्यास मिळणार आहे. यापेक्षा जास्त वेग हवा असल्यास वेगळे शुल्क भरावे लागणार आहे. तसेच महापालिकेच्या सर्व कार्यालयांना २0 एमबीपीएस वेगाने डेटा या सेवेअंतर्गत विनामूल्य पुरविला जाणार आहे. या योजनेतून महापालिकेस वर्षाकाठी ६१ लाखांचे उत्पन्न मिळेल, असा विश्वास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#LetterToAmbedkar : मोहिमेनुसार मंत्री जयंत पाटील यांचे बाबासाहेबांना पत्राद्वारे अभिवादन !

News Desk

मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक राज्यपालांच्या भेटीला, वडेट्टीवार आणि भुजबळांना हटवण्याची केली मागणी

News Desk

विधानपरिषदेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

swarit
राजकारण

राम कदम बेताल वक्तव्यामुळे सोशल मिडीयावर होत आहेत ट्रोल

News Desk

मुंबई | भाजपा आमदार राम कदम यांनी सोमवारी घाटकोपरमध्ये दहिहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित तरुणांशी बोलताना राम कदम यांनी वादग्रस्त विधान केले. ‘एखाद्या मुलाने एखाद्या मुलीला प्रपोज केले असेल, मात्र तिचा नकार असेल, तर त्याने त्याच्या आई-वडिलांना घेऊन माझ्याकडे यावे. त्या मुलाच्या पालकांना मुलगी पसंत असल्यास त्या मुलीला पळवून आणण्यात मी मदत करेन. या राम कदमांच्या वक्तव्यामुळे सर्वच स्तरातून त्यांचा निषेध व्यक्त केला जात आहे. सोशल मिडीयावर सध्या राम कदम यांच्यावर विविध प्रकारचे जोक व्हायरल होताना पहायला मिळत आहेत.

 

Related posts

बाटला हाऊस चकमकीत मारला गेलेल्या दहशतवाद्यांसाठी सोनियांना रडू आले

News Desk

विधानसभेचे विशेष अधिवेशन ३ व ४ जुलै रोजी होणार

Aprna

कॉंग्रेसने लोकशाहीची हत्या केली | नरेंद्र मोदी  

News Desk