HW News Marathi
महाराष्ट्र

विधानपरिषदेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

मुंबई : २१ मे रोजी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. सहा जागांसाठी निवडणुका होणार असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काँग्रेस तीन जागांसाठी युती होणार आहे. अमरावती, परभणी-हिंगोली व चंद्रपूर या जागांवर काँग्रेस लढवणार आहे. तर लातूर, कोकण, आणि नाशिकची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या आहेत.

उस्मानाबाद-बीड-लातूरमध्ये रमेश कराड, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये अनिकेत तटकरे आणि नाशिकमध्ये शिवाजी सहाणे राष्ट्रवादी काँग्रेसने या तीन जागेवर त्यांचे उमेदवार उभे केले आहे. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, परभणी-हिंगोली आणि अमरावती या जागेवर काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेने हिंगोली-परभणी विपुल बजोरिया, नाशिकमध्ये नरेंद्र दराडे आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गात राजीव साबळे यांना पक्षातून उमेदवारी दिली आहे. विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, भाजपचे दोन आणि काँग्रेसचा एक सदस्य विधानपरिषदेतून मे आणि जून अखेर निवृत्त होत असल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने ही निवडणूक जाहीर केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणातील काही खटले मागे घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय

News Desk

मुंबई लोकल सर्वासाठी सुरु करा, रोहित पवारांची मागणी

News Desk

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना अमित ठाकरेंनी दिली भेट

News Desk