HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापुरातून ११ हजार तर रायगडमधून ३००० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पश्चिम महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजला आहे. नद्यांनी धोक्याची पाण्याची पातळी ओलांडली असून राज्यात सध्या पुराची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा अर्धवट सोडून आज (७ ऑगस्ट) मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलविली होती. मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सातारा, सांगली, कोल्हापुरातील पुराचा आढावा घेतला.

सांगलीतील राजाराम बंधाऱ्यातून पाणी वाहू लागल्या लागल्याने कोल्हापुरातून २०४ गावातून ११ हजार नागरिकांना सरक्षित स्थलांतरी करण्यात आले. रायगड जिल्ह्यात 8 तालुके बाधित असून सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाला आहे. सुमारे ३००० लोकांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले आहे. ४३२ कुटुंबांतील ५१ हजार ७८५ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. सांगली ३०७ टक्के पाऊस झाला आहे. महिला, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना पुरातून बाहेर काढण्यासाठी प्राधान्य देत आहे.

मुख्यमंत्र्यांनी बैठकीपूर्वी पुरग्रस्तांना स्वच्छ पाणी, जेवण देण्याच्या सूचना प्रशासनाला दिला. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले की, सरासरीपेक्षाही जास्त पाऊस पडल्याने अनेक नद्यांना पूर आला. या भागात एनडीआरएफच्या २२ टीम दाखल झाल्या आहेत. तसेच ८० भारतीय जवानदेखील दाखल झालेत. करवीर, शिरोळमधील ८ गावे पुरात बुडाली आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरनाईकांच्या लेटरबॉम्बनंतर आता शिवतारेंचेही मुख्यमंत्र्यांना पत्र, काँग्रेस आमदारावर केले गंभीर आरोप

News Desk

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारातच समाजाला एकजूट ठेवून पुढे घेऊन जाण्याची ताकद  – अजित पवार

News Desk

‘माळीण’ गाव फडणवीस सरकारच्या भ्रष्टाचाराचे पारदर्शक उदाहरणः सचिन सावंत

News Desk