HW News Marathi
Covid-19

राज्यात १,२०६ पोलिसांना कोरोनाची लागण, ११ जणांचा मृत्यू

मुंबई | राज्यात लॉकडाऊनच्या नियमाचे पालन करण्यासाठी पोलीस दल दिवस रात्र काम करत आहे. आपले कर्तव्य बजावताना पोलीस दलातील आतापर्यंत १, २०६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर सध्या ९१२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत गेल्या २४ तासात, ६६ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत २८३ पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. तर ११ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३० हजार ७०६ झाली आहे. काल (१६ मे) १६०६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात काल ५२४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७०८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २२ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आतपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ६१ हजार ७८३ नमुन्यांपैकी २ लाख ३१ हजार ०७१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३० हजार ७०६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ३४ हजार ५५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १७ हजार ४८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी दोनदा लस घेतली अन् जिवंत आहे बघा !” असे सांगत झिरवळ आदिवासी पाड्यांवर का फिरतायत ?

News Desk

केरळमध्ये संपूर्ण लॉकडाऊन, ६६ टक्के जनता झाली कोरोनाबाधित

News Desk

मुख्यमंत्र्यांचा प्रशासनावर कोणताही वचक नाही, ते अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यातच व्यस्त !

News Desk