HW News Marathi
Covid-19

देशात कोरोनाचा कहर! रुग्ण संख्येने ओलांडला २ लाखांचा टप्पा

नवी दिल्ली | देशात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. आधी रोज ८० -९० हजारांच्या टप्प्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत होता. काही दिवसांनंतर तो १ लाखांच्या पुढे गेला होता. मात्र, आता तर हा आकडा २ लाखांच्या पुढे गेला आहे. गेल्या २४ तासांत देशात २,०००,७३९ रुग्ण वाढले आहेत. तर, ९३,५२८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आणि, १०३८ रुग्णांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला आहे.

 

महाराष्ट्रातही संख्या वाढतीच आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल (१४ एप्रिल) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज ५८ हजार ९५२ नव्या कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच गेल्या २४ तासांत नवीन ३९ हजार ६२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत एकूण २९ लाख ५ हजार ७२१ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर सध्या राज्यात एकूण ६ लाख १२ हजार ७० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८१.२१ % झाले आहे. सध्याची कोरोनास्थिती नियंत्रणात आणणे हे राज्य सरकारपुढचे सर्वात मोठे आव्हान आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज कोरोना २,४८७ नवीन रुग्णांची नोंद, कोरोनाच्या ३६ हजार ३१ रुग्णांवर उपचार सुरू

News Desk

“उलट त्याच सगळ्यांना धमकावत असतात”, अरविंद सावंतांचा नवनीत राणांच्या आरोपांवरुन पलटवार  

News Desk

यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा लालबागचा राजा मंडळाचा ऐतिहासिक निर्णय

News Desk