HW News Marathi
महाराष्ट्र

सगळा सत्यानाश चालू आहे; नवीन निर्बंधांनंतर चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका

पुणे | कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने होणारी वाढ पाहता राज्य सरकारने निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, १० जानेवारीपासून राज्यात रात्री संचारबंदी लागू असणार आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. दुसऱ्या लाटेनंतर राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत असताना सरकारचा लॉकडाऊनचा निर्णय योग्य नाही. नवीन नियमावली बनवत असताना सरकारने सर्वांसोबत बसून एकमताने निर्णय घेणे अपेक्षित आहे. पण, सरकारने विरोधकांना विचारात घेतले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटलांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी, राज्यात केवळ पाच पक्ष आहेत, पण तसं होतं नाही. सरकारला विरोधी पक्षांना विचारात घ्यायचं नसतं. राज्यात केवळ मनमानी कारभार सुरू आहे. किमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना तरी बैठकीत बोलवायचं, ते शासकीयदृष्ट्या शासनाचा भाग आहेत”, अशी टीका पाटलांनी सरकारवर केली आहे.

सरकारला पोटापेक्षा नशेची जास्त काळजी

पुढे ते म्हणाले, राज्य सरकार रात्रीचे उद्योग करणाऱ्यांवर निर्बंध आणत आहे, तर मग दिवसा चालणाऱ्या उद्योगांवरही निर्बंध आणा, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसंच आता जास्त निर्बंध लावून चालणार नाही. प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे, त्यामुळे सरकारने नागरिकांना कोणती काळजी घ्यावी हे सांगावं, निर्बंध लावू नये, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. तसेच सरकारला पोटापेक्षा नशेची जास्त काळजी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान त्यांनी दारूची होम डिलिव्हरी चालू केली. पेट्रोल, डिझेल वरील व्हॅट कमी करायचा नाही पण दारूवरचा करायचा, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला आहे.

सर्वसामान्य माणूस प्रचंड गोंधळलेला

कधी शाळा सुरु करतात, तर कधी बंद करतात, कधी परीक्षा ऑनलाइन म्हणता, तर कधी ऑफलाइन म्हणता, त्यामुळे हा सगळा सत्यानाश चालला आहे. या सर्वामुळे सर्वसामान्य माणूस प्रचंड गोंधळलेला आहे. सरकारने सर्वांसोबत बसून एकमताने निर्णय घेणे अपेक्षित आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे जालन्यात एक बोलणार, उपमुख्यमंत्री अजित पवार एक बोलणार, चंद्रपुरात वडेट्टीवार वेगळं बोलणार, शंभर लोकांच्या मुलाखती घेतल्यातर सत्यानाश सुरु आहे, हे कळतं. निर्बंध कडक करताना लोकांना घाबरवू पण नका, असंही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्दिष्टपूर्तीची दिशा हरवलेला अर्थसंकल्प! – मुख्यमंत्री

Aprna

“केंद्र सरकार कर्तव्यात चुकल्यानेच OBCआरक्षण रद्द झालं”

News Desk

जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार; कंत्राटदारांवर 4 हजार कोटींची खैरात : धनंजय मुंडे

News Desk