HW News Marathi
महाराष्ट्र

‘१२ आमदारांच्या यादीवर तोंडावर मास्क ठेवलेलचं बरं, पण आमदारकी मिळाली तर आनंदच – मातोंडकर

पुणे। पावसाळी अधिवेशन संपल्या नंतरही राज्यपाल निवडीचा प्रश्न काही सुटेना, तर शिवसेनेकडून अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांना आमदारकी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल त्यांचे नाव राज्यपालांकडे पाठवले आहे . १२ आमदारांच्या यादीवर मी तोंडावर मास्क ठेवलेलाच बरं आहे , पण आमदारकी मिळाली तर आनंदच आहे ‘, असं म्हणत ऊर्मिला यांनी आपली इच्छा पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे . आज शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे . उर्मिला मातोंडकर आणि महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुण्यातून या अभियानाला सुरुवात केली आहे . यावेळी माध्यमांशी त्या बोलत होत्या याच वेळी मातोंडकर यांनी महाराष्ट्रातल्या घडामोडींबद्दल भाष्य केलं.

मी पुण्यात चार दिवसांचा दौरा केला होता. कुणाला ही सांगितलं नव्हतं . माध्यमांना ही नाही . नाहीतर नेते एक केळ देतात आणि चार फोटो टाकतात . पण त्याऐवजी मला काम करायला आवडतं . विधान परिषदेची आमदारकी मिळाली तर आनंदच होईल . पण , सध्या १२ आमदारांच्या यादीवर मी तोंडावर मास्क ठेवलेलं बरं आहे , असंही म्हणत ऊर्मिला यांनी आमदारकीची इच्छा बोलून दाखवली . राजकारण नको रे बाबा ! रजनीकांत यांनी पक्षच केला बरखास्त ‘ लव्ह जिहादला महाराष्ट्रात थारा नाही. अन्याय कुठल्याही प्रकारात असू द्या त्याला विरोध करायलाच हवा. शिवसेनेकडून कुणी विरोध करत असेल तर मी त्यांना ही सांगेन . या गोष्टी राजकीय फायदा घेण्यासाठी असा विरोध होतो , असं मत ऊर्मिला यांनी व्यक्त केलं . सचिन वाझे आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचे प्रकरण न्यायालयात आहे . त्यामुळे यावर बोलणे योग्य ठरणार नाही . काही जण दिवसरात्र या विषयांवर ओरडत आहेत त्यावर मी काय बोलणार . कामाच्या गोष्टी बोलल्या पाहिजेत.लोकांच्या समस्या सोडून भलत्याच गोष्टींवर लोक बोलतात , असं म्हणत ऊर्मिला यांनी विरोधकांना टोला लगावला .

महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीने जितकं उत्तम काम कोरोनाच्या काळात केलं असतं त्यापेक्षा जास्त उत्तम काम उद्धव ठाकरे यांनी केलंय आणि घराघरांतून त्यांना तशी पावती ही मिळाली . त्यांनी योग्य नियोजन केल्यामुळे कोरोनाची परिस्थितीत नियंत्रणात मिळवता आली आहे , असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं, मुख्यमंत्र्यांनी पदभार घेतल्यापासून अत्यंत कठीण काळाचा सामना त्यांना करावा लागला आणि त्यांनी धीरोदत्त राहून केला . श्रेय देऊ द्यात किंवा नको देऊ द्यात पण देशात सर्वात उत्तम काम त्यांनी केलं, त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. पण त्यांना उत्तर देण्यात वेळ न घालवता विकासावर लक्ष केंद्रीत केलंय . ओरडणारे ओरडतच राहतील , असं म्हणत विरोधकांना चांगलाच टोला लगावला .

चित्रा वाघांना टोला-

‘सामना’बाबत शिवसेना नेते संजय राऊतच अधिक माहिती देतील. तो त्यांना अधिकार आहे. दुसऱ्या कुणाला अधिकार नाही. शिवसेनेत नसलेल्या लोकांनी तर त्यावर बोलूच नये, अशा शब्दात त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा समाचार घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणुकीत आमचा थोडक्यात पराभव – जयंत पाटील

News Desk

राणेंना झालेल्या अटकेच्या कारवाईवर पहिल्यांदाच पत्नी नीलम राणे यांची प्रतिक्रिया!

News Desk

ठाकरे सरकारकडून अनेक नावांची शिफारस, केंद्राने प्रदान केला फक्त एक पद्म!

News Desk