HW News Marathi
महाराष्ट्र

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी तळीये गावाला देणार भेट….!

मुंबई। महाड मधल्या तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 40 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे. तर दरडीखाली अख्खं गावच संपलं आहे, त्यामुळे संपूर्ण गावावर दरडी सोबतच दुःखाचा डोंगर पसरला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी तळीये गावात जाऊन या भागाची पाहणी करणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (२४जुलै) दुपारी 12 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे निघणार आहेत. महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचून ते वाहनाने तळीये गावासाठी रवाना होतील. दुपारी 1.30 वाजता तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करतील. दुपारी 3.20 वाजता ते परत महाड होऊन मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील. तळीयेला पोहोचल्यावर ते गावकऱ्यांशी संवाद साधतील. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची विचारपूस करतील. त्यानंतर प्रशासानाकडून घटनेची माहिती घेतील, अशी माहिती आता समोर आली आहे.

कशी झाली ही संपूर्ण घटना?

महाडमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं तर गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून सुरुवातीला 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. नंतर मृतांचा आकडा 40 वर पोहोचला. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.दरम्यान, एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासनाकडून कोणीही आलेलं नाही, अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे जखमींवर त्वरित उपचार करावा अशी मदतीची याचना स्थानिक करत आहेत.

शासनाची अशी निगरगट्टी यंत्रणा आयुष्यात पाहिली नाही- प्रवीण दरेकर

एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासन संवेदनशील नाही, सरकार भावनाशून्य झालंय. शासनाच्या ही अशी निगरगट्ट यंत्रणा मी माझ्या आयुष्यात पाहिलेली नाही, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आपला संताप व्यक्त केला. माझी शासनाकडे विनंती आहे की या घटनेकडे गांभीर्याने बघून त्वरित मदत कार्य सुरू करा, अशी मागणी दरेकर यांनी केली.ही घटना मोठी आणि दुर्दैवी असल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधून हेलिकॉप्टर मागवावे, असंही प्रवीण दरेकर म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीन गडकरी चांगला माणूस पण चुकीच्या पक्षात – अशोक चव्हाण

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज घेतले पाच महत्त्वाचे निर्णय

News Desk

“उद्धव ठाकरेंसारखा स्वातंत्र्य देणारा मुख्यमंत्री लाभला हे माझं नशीब”

News Desk