HW News Marathi
देश / विदेश

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक, मीराबाई चानूने रचला इतिहास….!

टोकियो। भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये दुसरा क्रमांक पटकावत भारताला रौप्य पदक मिळवून दिलं आहे. मीराबाई चानूने ही कमाल 49 किलोग्राम महिला वर्गात केली आहे. तिने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क राउंडमध्ये मिळून तब्बल 202 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावलं आहे. मीराबाईने स्नॅच राउंडमध्ये 87 किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलत हे यश मिळवलं. तर 49 किलोग्राम वर्गात चीनच्या जजिहु हिने सुवर्ण पदक पटकावलं आहे.

मीराबाईने पहिल्या प्रयत्नात 81 किलोग्राम वजन

49 किलोग्राम वर्गात महिला वेटलिफ्टिंगची सुरुआत स्नॅच राउंडने झाली. ज्यात मीराबाईने पहिल्या प्रयत्नात 81 किलोग्राम वजन उचललं. ज्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 87 किलोग्राम वजन उचलंल. तिसऱ्या प्रयत्नात तिने 89 किलोग्राम वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण ती अयशस्वी ठरली आणि केवळ 87 किलोग्रामच उचलू शकली. त्यामुळे स्नॅच राउंडमध्ये ती दुसरी आली. त्यात चीनच्या जजिहु हिने 94 किलो वजन उचलत पहिला क्रमांक पटकावला.

पहिल्या प्रयत्नातच अप्रतिम कामगिरी

त्यानंतर क्लीन अँड जर्क राउंडची सुरुवात झाली आमि मीराबाईने पहिल्या प्रयत्नातच अप्रतिम कामगिरी करत 110 किलो वजन उचलला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 115 किलो वजन उचललं. पण अखेरच्या तिसऱ्या प्रयत्नात 117 किलो वजन उचलण्यात ती अयशस्वी ठरली. ज्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. तर चीनच्या जजिहुने क्लीन अँड जर्कमध्ये 116 किलो वजन उचलत सुवर्ण पदक

जिंकलं.

भारत सरकारने राजीव गांधी खेलरत्न

26 वर्षीय मीराबाई ही मूळची मनिपूर राज्यातील असून तिचं संपूर्ण नाव साइखोम मीराबाई चानू असं आहे. ती भारताची आघाडीची महिला वेट लिफ्टर आहे. 2018 मध्ये तिला भारत सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने देखील सन्मानित केलं होतं. 2018 मध्ये तिला क्रीडा विभागातून पद्मश्री पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता.

 

पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक

मीराबाई चानूने हे रौप्य पदक पटकावत ऑलिम्पिक्स खेळात महिला वेटलिफ्टिंगमध्ये भारताला इतिहासातील दुसरं पदक मिळवून दिलं. याआधी 2000 साली सिडनी ऑलम्पिकमध्ये कर्नम मल्लेश्वरी हिने पदक जिंकलं होतं. ऑलम्पिकमध्ये सिल्वर जिंकणारी मीराबाई ही बॅडमिंटन स्टार पी.व्ही सिंधूनंतर पहिली भारतीय महिला आहे. तिच्या या कामगिरीचं सर्व स्तरातून कौैतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चारा घोटाळ्याचा कट रचल्याचा चालणार लालू यादव यांच्यावर खटला

News Desk

शरद पवार बोलले ‘तो’ राष्ट्रवादीचा अजेंडा, मात्र शिवसेनेचे हिंदुत्त्व जगजाहीर !

News Desk

आता शाळेच्या प्रवेशासाठी आधार कार्डाची सक्ती नाही

News Desk