HW News Marathi
देश / विदेश

शरद पवार बोलले ‘तो’ राष्ट्रवादीचा अजेंडा, मात्र शिवसेनेचे हिंदुत्त्व जगजाहीर !

मुंबई | “शरद पवार जे बोलले तो त्यांच्या पक्षाचा अजेंडा आहे. मात्र, शिवसेनेचे हिंदुत्त्व हे जगजाहीर आहे. त्यामुळे, आता राम मंदिरावरून कोणीही राजकारण करू नये”, असे आवाहन शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे. अयोध्या राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यावरून सध्या राज्यातील राजकारण पेटले आहे. राज्यातील महाविकासआघाडी सरकारमध्ये यावरून मतमतांतरे दिसून येत आहेत. एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्याबाबत नाराजी व्यक्त केलेली असताना दुसरीकडे अयोध्या राम मंदिर मात्र शिवसेनेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. याच पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांनी आता भाष्य केले आहे.

“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देशाचे नेते आहेत. ते जे काही बोलले तो त्यांच्या पक्षाच्या अजेंड्याचा भाग आहे. शिवसेनेचे हिंदुत्व जगजाहीर आहे. आमच्या पक्षाच्या भूमिकेबाबत कोणीही प्रश्न उपस्थित करु नये. राम मंदिराबाबत कोणीही राजकारण करु नये. भाजपने वाटोळ केले म्हणून महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी तीन पक्ष एकत्र आले आहेत. महाविकास आघाडी विकासाच्या मुद्यांवर एकत्र आली आहे. तिन्ही पक्षांची विचारधारा वेगळी आहे”, असे प्रताप सरनाईक म्हणतात. दुसरीकडे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणारच असे स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांची स्वेच्छानिवृत्ती, बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता !

News Desk

एटीएममधून १०० ऐवजी पाचशेच्या नोटा

News Desk

काँग्रेसची महाराष्ट्रातील दुसरी उमेदवार यादी जाहीर ,माणिकराव ठाकरे यांना पुन्हा संधी

News Desk