HW News Marathi
महाराष्ट्र

‘राज्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय’, मुख्यमंत्र्यांची आपत्कालीन बैठक!

मुंबई। गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी पावसाने झोडपून काढले कुठे पूरस्थिती तर कुठे दळी पासून अनेकांचे नुकसान झाले, तर याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर आपत्कालिन आढावा बैठक आयोजित केली. राज्याचे मुख्य सचिव आपत्कालिन विभागाचे अधिकारी आढावा बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे वर्षा बंगल्यावर उपस्थित आहेत. या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे एकाच गाडीतून वर्षा बंगल्यावर पोहोचले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता

राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका आहे अशा ठिकाणी संरक्षण भिंत उभारणार आहेत. समुद्रकिनारी पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी संरक्षण भिंत उभारली जाणार आहे. समुद्राचे पाणी गावांमध्ये शिरून घटना घडू नये किंवा शेत जमिनी समुद्राच्या पाण्याने खराब होऊ नये यासाठी संरक्षण भिंत बांधणार आहे. पाच जिल्ह्याच्या अनेक भागात जवळपास 171 किलोमीटर संरक्षण भिंत बांधावी लागणार आहे. यासाठी जवळपास 1600 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी ,रायगड, ठाणे आणि पालघर या 5 जिल्ह्यात ही संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे

आपत्कालिन बैठक आयोजित केली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पूरपरिस्थिती च्या पार्श्वभूमीवर सलग तीन दिवस पूरग्रस्त भागाचा दौरा झाला, तुफान पावसाने हाहाकार माजवल्याने राज्याच्या अनेक भागात मोठं नुकसान झालं आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर चिपळूण, सातारा इथेही दरड दुर्घटना घडल्या. मुख्यमंत्र्यांनी रायगड आणि चिपळूणचा दौरा केला. त्यानंतर आज मुख्यमंत्री साताऱ्यातील कोयनानगरला जात होते. मात्र तुफान पावसामुळे हेलिकॉप्टर लँड होऊ शकत नसल्याने, मुख्यमंत्री परत पुण्याला आले. तिथून ते मुंबईला परतले. त्यानंतर त्यांनी वर्षा बंगल्यावर आपत्कालिन बैठक आयोजित केली.

मुख्यमंत्र्यांचा चिपळूण, रायगड दौरा

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल 25 जुलैला चिपळूणचा तर 24 जुलैला रायगड जिल्ह्यातील तळीये दरडग्रस्त भागाचा दौरा केला. तळीये इथं दरड कोसळून 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर चिपळूणमध्ये पावसाने हाहाकार माजवल्यामुळे नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

लोकप्रियतेसाठी लगेच घोषणा नाही

केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई संदर्भात मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकारांशी संवाद साधताना चिपळूण येथे सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“खासदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री, सर्वच तुमचे, लोकांची सेवा कधी करणार?,” दरेकरांचा सवाल

News Desk

इमारतीचा एका इंचचे बांधकाम अनधिकृत ठरले…!

Aprna

जलयुक्त शिवार, घरकुल व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ‘मिशन मोड’ वर राबवाव्यात! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna