HW News Marathi
Covid-19

राज्यात पहिली ते १२ वीपर्यंतच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात, महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई | कोरोनास्थितीचा फटका सध्या विविध क्षेत्रांना बसत आहे. शैक्षणिक क्षेत्र हे अशाच काही महत्त्वाच्या क्षेत्रांपैकी एक आहे. दरम्यान, काहींची दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाने आपला ३०% अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या शिक्षण विभागानेही एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने आता १ ली ते १२ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्याच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या संकटकाळात विद्यार्थ्यांवरील ताण काहीसा कमी होईल.

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा, महाविद्यालये सध्या बंद आहेत. याच पार्श्वभूमीवर, राज्य सरकारच्या घोषणेनुसार १५ जूनपासून ऑनलाईन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षणात काही मर्यादा आहेत. अभ्यासक्रम पूर्ण होणे हे आव्हानात्मक आहे. त्यामुळे, राज्य सरकारने अभ्यासक्रमात कपात करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘एन-95’ मास्क किंवा कोणतेही मास्क असो ते ठराविक किंमतीत विकावे

swarit

ओमायक्रॉनच्या उपचार पद्धतीबाबत लवकरच निर्णय! – राजेश टोपे

Aprna

५ ऑगस्टपासून जीम-योगा सेंटर सुरु करण्यास केंद्राचा परवानगी, ‘हे’ आहेत नियम

News Desk