HW News Marathi
महाराष्ट्र

‘मुंबईत ३ टक्के घटस्फोट हे ट्रॅफिकमुळे’; अमृता फडणवीसांचं पुराव्यासह स्पष्टीकरण

मुंबई | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायमच चर्चेत असतात. वेगवेगळ्या मुद्यांवर त्या आपलं मत व्यक्त करत असतात. आता सुद्धा अमृता फडणवीस या त्यांच्या नव्या दाव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. काल (४ फेब्रुवारी) पत्रकारांशी संवाद साधत असताना मुंबईतीत ३ टक्के घटस्फोट हे वाहतूक कोंडीमुळे होत असतात, असा अनोखा दावा त्यांनी केला आहे. तर त्यांच्या या दाव्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्याचं पाहायला मिळालं. यावेळी अनेकांनी त्यांच्यावर टीका देखील केली. तर आता अमृता फडणवीसांनी आपला दावा खरा असल्याचं सांगत एका संकेतस्थळावरील दाखले दिले आहेत.


मुंबईत ३ टक्के घटस्फोट हे ट्रॅफिकमुळे होत असल्याचा दावाच अमृता फडणवीसांनी केला असून त्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली होती. पेडणेकर म्हणाल्या, “अमृता फडणवीस दरवेळी ऐकावं ते नवलंच अशा प्रकारचंच बोलतात. आता तर त्यांनी जावईशोध लावला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर हसावं की रडावं असा प्रश्न पडला आहे”, अशी खोचक टीका पेडणेकरांनी केली होती. तसेच मुंबईकर आता अमृता फडणवीसांच्या या करमणुकीच्या कार्यक्रमाला कांटाळले आहेत’, असा टोलाही पेडणेकरांनी यावेळी लगावला आहे.

अमृता फडणवीसांचं स्पष्टीकरण

दरम्यान, या नंतर अमृता फडणवीसांनी आपल्या बोलण्याचे दाखले दिले आहेत. त्या म्हणाल्या, “मी जे म्हणाले ते एका सर्व्हे एजन्सीने सादर केलेल्या डेटामधून मला त्या संदर्भात माहिती मिळाली होती. सर्व्हे मंकी डॉट कॉम यांनी लोकांच्या घटस्फोटाबाबत हा डेटा दिला होता. यामध्ये ३ टक्के लोकं हे घटस्फोट घेतात. ज्यात अनेक कारणं होती आणि त्यातील एक कारण ट्रॅफिक जॅम हे होतं. त्यांच्या घरगुती आयुष्यावर परिणाम होत होता. त्यांचा अधिक वेळ ट्रॅफिकमध्ये जात होता. त्यामुळे ते घरी वेळ देऊ शकत नव्हते आणि त्यामुळे त्यांचे घटस्फोट झाले, असा दावा अमृता फडणवीसांनी केला आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १६९ मतांनी विश्वासदर्शक ठराव मंजूर

News Desk

मुंबईत प्राण्यांच्या मृत्यूनंतर दफनासाठी विशेष व्यवस्था करण्याबाबत सकारात्मक! – जितेंद्र आव्हाड

Aprna

गोपिनाथ मुंडे,एक नावाजलेला ‘लोकनेता’!

swarit