HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपा नेत्यांवर ३०२ चे गुन्हे दाखल केले पाहिजेत; काँग्रेसची मागणी!

मुंबई। काही दिवसांपूर्वी नागपूरचे रहिवाशी मोहनीश जबलपुरे यांनी माहितीच्या अधिकारातून केंद्रीय माहिती अधिकाऱ्याला एक प्रश्न केला होता. हिंदू खतरे में है असं सांगितलं जात आहे. त्याबद्दलची माहिती आणि पुरावे द्यावेत, अशी मागणी जबलपुरे यांनी केली होती. त्यावर माहिती अधिकाऱ्याने हे उत्तर दिलं आहे.

आता ‘हिंदू खतरे में है’ ही निव्वळ कल्पना होती

काल्पनिक प्रश्नांना उत्तर देणं हे आमचं काम नाही. तसेच तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरही आमच्याकडे नाही, असं सांगतानाच त्यामुळे तुम्ही गृहखात्याकडे त्याची विचारणा करावी, अशा सूचनाही माहिती अधिकारी व्ही. एस. राणा यांनी जबलपुरे यांना केली आहे. दरम्यान आता ‘हिंदू खतरे में है’ ही निव्वळ कल्पना होती, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. केंद्रीय माहिती अधिकाऱ्याने माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीत हा खुलासा केला आहे. याच मुद्द्याला धरून आता कॉंग्रेसने भाजपला खडे बोल सुनावले आहे.

‘हिंदू धर्म संकटात आहे हा भाजपाचा जुमलाच होता हे स्वतः अमित शहांच्या गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पण या भयानक जुमल्यातून भाजपाने सत्तेसाठी विद्वेषाचे वातावरण पसरवले. धार्मिक उन्मादातून देशात लिंचिंग झाले, हत्या झाल्या त्याबद्दल भाजपा नेत्यांवर ३०२ चे गुन्हे दाखल केले पाहिजेत.’ अशी मागणी आता कॉंग्रेसचे नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग, IPS रश्मी शुक्लांचा कोर्टात मोठा  दावा

News Desk

महत्वाकांक्षी योजना तसेच प्रकल्पांच्या कामाला वेग द्या! – मुख्यमंत्री

Aprna

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विधिमंडळाच्या नेत्यांची होणार बैठक

News Desk