HW News Marathi
महाराष्ट्र

कर्जमाफीसाठी 32 लाख शेतकऱ्यांचे अर्ज

मुंबई- राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी सुमारे 32 लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरल्याची माहीती हाती आली आहे. ३३ जिल्ह्य़ांमधून ३२ लाख ८ हजार अर्जाची ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी २६ लाख ७२ हजार ८५७ अर्ज शासन स्तरावर स्वीकारण्यात आले आहेत. येत्या १ ऑक्टोबरपासून पात्र शेतकऱ्यांच्या बँकखात्यात कर्जमाफीची रक्कम थेट जमा करण्यात येणार असून कर्जमाफी आणि पिकविम्याकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यासाठी ३४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवार-फडणवीस भेटीवर राज ठाकरे म्हणतात….

News Desk

इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ आज अकोले तालुका बंदची हाक

swarit

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली

Aprna