HW News Marathi
महाराष्ट्र

जम्मू-काश्मिरमध्ये ३७० कलम लागू होणार नाहीच- देवेंद्र फडणवीस

मुंबई | जम्मू-काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या गुपकर अलायन्सच्या मुद्द्यावरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. देश तोडण्याची भाषा करणाऱ्या गुपकर अलायन्सचा अजेंडा तुम्हाला मान्य आहे का?, असा सवाल करतानाच आता काहीही झालं तरी जम्मू आणि काश्मीरमध्ये ३७० कलम लागू होणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जम्मू-काश्मीमध्ये भारतविरोधी शक्ती तिथल्या विविध राजकीय पक्षांसोबत हातमिळवणी करुन तिथे पुन्हा एकदा कलम ३७० लागू झाला पाहिजे, अशाप्रकारचा प्रयत्न करत आहेत. तिथे पुन्हा कलम ३७० लागू व्हावं, यासाठी तेथील अनेक पक्षांचं एकत्रिकरण झालं आहे. या गुपकर आघाडीत काँग्रेसदेखील सहभागी झाली आहे. काँग्रेसला मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही ज्या आघाडीत सामील झाले आहेत त्याचा अजेंडा तुम्हाला मान्य आहे का?”, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

काश्मीरमध्ये पीडीपी जोपर्यंत आमच्यासोबत होती तोपर्यंत भारताच्या तिरंगाचा अपमान करण्याची त्यांची हिंमत झाली नाही. आता ते तिरंग्याचा अपमान करत असाताना काँग्रेस त्यांच्यासोबत जात आहे. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी यावर उत्तर द्यावं”, असं देखील फडणवीस म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आघाडीतील कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी समन्वय समिती स्थापन!

News Desk

राज्य सरकारकडे संभाजीराजेंनी केल्या ‘या’ ७ मागण्या मान्य

Aprna

नवजात मुलीला मातेनेच जिवंत पुरले

News Desk