HW News Marathi
महाराष्ट्र

कर्नाटकातील आलमट्टी धरणातून ५ लाख क्यूसेक्स पाणी सोडले

कर्नाटक | आलमट्टी धरणात पाच लाख क्यूसेक्स पाणी सोडायला निर्णय कर्नाटक सरकार तयार आहे. यामुळे सांगलीतील पाणी ओसरायला मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीची पूर परिस्थिती आटोक्यातआण्यासाठी कर्नाटक सरकारला विनंतीनंतर केली. यानंतर आलमट्टी धरणातून ५ लाख क्युसेक्स पाणी सोडण्यास कर्नाटक सरकारची तयारी दाखली आहे. यामुळे सांगली जिल्ह्यातील पूर ओसरण्यास मदत होणार आहे.

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत अजूनही वाढ होत आहे. सांगलीतील आयुर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी ५६ फूट ८ इंचावर गेली आहे. तर सांगली जिल्ह्यातील ७० हजार नागरिक आणि २१ हजार जनावरे स्थलांतरित करण्यात आली आहेत. तसेच २१ हजार ५०० हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली आहे. भारतीय सैन्य आणि एनडीआरएफच्या टीमकडून अजूनही बचावकार्य सुरुच आहे. आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता ईडीकडून नितीन सरदेसाईंची देखील चौकशी होणार

News Desk

इक्बाल कासकरला कारागृहात व्हीआयपी सेवा, ५ पोलीस कर्मचारी निलंबित

Gauri Tilekar

संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे गर्दी केली नाही, शिवसेना नेत्याची क्लीनचीट

News Desk