HW News Marathi
महाराष्ट्र

एकाच दिवशी आठ शेतकऱ्यांची आत्महत्या

औरंगाबाद | मराठवाड्यात आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यात औरंगाबाद, जालना आणि बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. नापीक आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. गंगापूर तालुक्यातील पाडळसा येथील राम सोपान सोनवणे (३३), पैठण तालुक्यातील आडूळ खुर्दचे सूर्यभान हरिभाऊ भावले (४०) आणि कन्नड तालुक्यातील आडगाव येथील जुहुरचे अनिल केरुजी सोनावणे (३४) या तीघांनी आत्महत्या केली असून कोणी शेतीसाठी पैसे घेतले, कपसाचे पीक पूर्णपणे उद्धवस्त झाले म्हणून तर कोणी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत नाव न आल्याने कारणामुळे औरंगाबाद मधील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समजते.

तर बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील होळ येथील आबासाहेब शिंदे(४४), परळी तालुक्यातील सिरसाळा गावात एकनाथ गंगाराम चव्हाण (४५) या शेतकऱ्यांनी ग्रामीण बँकेतून कर्ज घेतले म्हणून आत्महत्या केली. दुसरीकडे जालना जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. साहेबराव एकनाथ मिचके (६५) या शेतकऱ्यांनी जाफराबाद पोलिस ठाण्यात विष प्राशन करुन आत्महत्या केली. तर जाफराबाद मधील अजून एक आत्महत्याची घटना घडली. यात आसाराम नंदू पवार(५०) यांनी विहिरीत उडी मारुन जीवन संपविले. जालना तालुक्यातील बाबर पोखरी येथील दिलीप दत्तू पवार (२९) या तरुण शेतकऱ्यांनी कर्ज आणि नापीकीमुळे आत्महत्या करण्याचे पाऊल उचलेल्याचे कळाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कडकनाथ घोटाळा प्रकरण | राजू शेट्टी स्वतःच ईडीच्या कार्यालयात दाखल

News Desk

कुस्तीपटूंना मानधनासोबत निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणार! – चंद्रकात पाटील

Aprna

फडणवीसांना आम्ही संन्यास घेऊ देणार नाही कारण महाराष्ट्राला त्यांची गरज! – संजय राऊत

News Desk
क्राइम

मिलिंद एकबोटेविरधात अटक वॉरंट जारी

swarit

पुणे – भिमा-कोरेगाव दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात पुणे सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून मिलिंद गायब झाले आहेत. त्यांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामिनाची याचिका दाखल केली होती. पण, कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर त्यांनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. पण, येथे ही त्यांची याचिका फेटाळून लावल्यामुळे एकबोटेंना अटक अटळ आहे. यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले असून एकबोटे यांचा कसून शोध घेतला जात आहे.

भिमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला वदंना करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर जमावाने हल्ला केला होता. त्यात एक व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण झाला होता. या प्रकरणात मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिंड गुरुजी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

Related posts

भोकर पोलीस ठाणे झाले आता ” स्मार्ट “

News Desk

भावजयीच्या प्रेमात दीर झाला बेभान, पत्नी आणि मुलांचा गळा चिरला

News Desk

मंजुळावर तुरूंगात पाशवी लैंगिक अत्याचार – इंद्राणीची माहिती

News Desk