HW News Marathi
महाराष्ट्र

औरंगाबादेत भव्य मराठा क्रांती रॅली

औरंगाबाद – आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाकडून राज्यभर भव्य मोर्चे काढण्यात येत आहेत. ऑगस्ट क्रांतीदिनी मुंबईमध्ये होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी औरंगाबादमध्ये भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. मुंबतील मोर्चासाठी वातावरणनिर्मिती करण्याच्या उद्देशाने ही रंगीत तालीम करण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे मराठा मूक मोर्चाप्रमाणे वाहन रॅलीतही महिला आघाडीवर होत्या.

मराठा क्रांती मोर्चाच्या वाहन रॅलीला छत्रपती महाविद्यालयापासून सुरुवात झाली. गजानन मंदिर, क्रांती चौक, जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गे कॅनॉट परिसरात रॅलीचा शेवट करण्यात येणार आहे. हजारोंच्या संख्येने महिला युवती आणि युवक या रॅलीत सहभागी झाले आहेत. एक मराठा लाख मराठा जय घोषाने शहराचे मुख्य रस्ते दणाणून गेले होते.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पहिला मूक मोर्चा औरंगाबदमधून काढण्यात आला होता. त्यानंतर राज्यभरात विविध शहरात मोठ्या संख्येने ५७ मोर्चे काढण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हे मोर्चे काढण्यात आले. मात्र कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे ९ ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये नियोजन बैठकाही घेण्यात आल्या. त्याचाच भाग म्हणून मंगळवारी शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बाबा या वयात मी फिरतोय तु किमान घराबाहेर पड, असं शरद पवारांना म्हणायंचं असेल – चंद्रकांत पाटील

News Desk

बीड पोलीस दलासाठी वाहनांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते संपन्न!

News Desk

साताऱ्यात शिवशाही-खासगी बसमध्ये धडक, ५० जण जखमी

News Desk
मुंबई

गोड्या पाण्यातील मच्छिमारांचे धरणे आंदोलन

News Desk

मुंबई – राज्यात परंपरागत गोड्या पाण्यात मासेमारी करणारे मच्छिमार विविध मागण्यांसाठी 2 ऑगस्ट रोजी आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आझाद मैदान येथे करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छिमारांचे कर्ज माफ करण्यासाठी समिती स्थापन करण्यात यावी. मत्स्यव्यवसायाची इत्यंभूत माहिती असणाऱ्या व्यक्तीला मत्स्यव्यवसाय मंत्री म्हणून नेमावे आणि महादेव जानकर यांच्याकडून हे पद काढून घ्यावे अशी मागणी यावेळी महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीच्यावतीने करण्यात आली.

Related posts

पावसाळापूर्व कामांची पाहणी करण्याचे आयुक्तांचे आदेश

swarit

बीआरटी टेंडरमध्ये मंत्र्याचा हस्तक्षेप ; मनसेचा आरोप

News Desk

डहाणूत ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली

News Desk