HW News Marathi
महाराष्ट्र

बाबा या वयात मी फिरतोय तु किमान घराबाहेर पड, असं शरद पवारांना म्हणायंचं असेल – चंद्रकांत पाटील

पुणे | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालपासून (१९ ऑक्टोबर) राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. या आधी मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नव्हते म्हणून विरोधी पक्ष टीका करत होते. तर आता बाहेर पडल्यावरही मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सुरुच आहे. मुख्यमंत्र्यांनी धावत प्रवास करून उपयोग नाही. त्यांनी कोरडा प्रवास करू नये. ते मुख्यमंत्री आहेत. थेट निर्णय घेऊ शकतात. शेतकऱ्यांना थेट मदत देऊ शकतात, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. बाबा, या वयात मी इतका फिरतो तू किमान घराबाहेर पड, असं कादाचित शरद पवारांना म्हणायचं असेल, अशी बोचरी टीकाही यावेळी त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्री हे निर्णय घेऊ शकतात. त्यांनी धावता प्रवास करण्याची गरज नाही. कोरड्या प्रवासातून काहीही निष्पन्न होणार नाही. त्यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचा निर्णय घ्यावा. पंचनामे करण्याचीही गरज नसल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. प्रत्येक वेळी केंद्र केंद्र करायचं नसतं. आपत्तीच्या वेळी पहिली मदत राज्य सरकारने करायची असते. नंतर केंद्राकडे मदत मागायची असते. राज्य सरकारने आधी मदत घोषित करावी, केंद्रकडून जे मिळेल ते बोनस समजायचं, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जपानहुन आलेल्‍या ६१ परदेशी नागरिकांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले

News Desk

“मी सेटलमेंट केली तर महाराष्ट्राचे डीजीपी माझ्या विरोधातील…” परमबीर सिंगांचा आरोप

News Desk

मी तुम्हाला खर्च करण्यासाठी पैसे उसने देतो पण… रोहीत पवारांचा मोदींना टोला

News Desk