HW News Marathi
महाराष्ट्र

शिवरायांचा सविस्तर इतिहास सहावीच्या पुस्तकात उलगडणार

मुंबई। राज्याच्या आंतराष्ट्रीय शिक्षण मंडळानी इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास वगळण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. यानंतर इतिहासकार, तज्ज्ञ शिक्षक आणि ऐन निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी याला विरोध केला. राज्यभरात मंडळाविरोधात संतापाची लाट उसळल्यानंतर त्याना अखेर जाग आली. या संपूर्ण प्रकरणावर मंडळाने स्पष्टीकरण दिले की, मात्र चौथीच्या विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीप्रमाणे शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रमातील संदर्भ मर्यादित ठेवून पुढे सहावीच्या पुस्तकात त्याची सविस्तर मांडणी करण्यात येणार असल्याचे आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रम विकसन समितीने स्पष्ट दिली.

इयत्ता सहावीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करण्यासाठी केलेल्या संघर्षाबरोबरच त्यांची आदर्श प्रशासन व्यवस्था मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर शिवचरित्रातील प्रेरणादायी पैलूही सहावीच्या पाठ्यपुस्तकातून उलगडण्यात येतील. महाराष्ट्रातील प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील राजसत्ता, छत्रपती शिवरायांचे कार्य, त्यांचे प्रशासन, तत्वे, नीती आणि शिवचरित्र यांचे विचार यांची ओळख इयत्ता सहावीमध्ये स्वतंत्रपणे करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास वगळण्याची माहिती चुकीची असल्याचे मंडळाकडून सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एका महान पित्याचा मुलगा असणे म्हणजे…कंगणाने थेट मुख्यमंत्र्यांना केले टार्गेट

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वैभव पिचड भाजपमध्ये करणार प्रवेश ?

News Desk

‘उद्धव ठाकरे इलेव्हन’ दिवाळीपर्यंत तुरुंगात, किरीट सोमय्यांचा इशारा!

News Desk