HW News Marathi
महाराष्ट्र

ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा एकत्र चिपळूण दौऱ्यावर

मुंबई | राज्यातील पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सध्या पुरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. अशात आता ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आज (२९ जुलै) पूरग्रस्त कोकण दौऱ्यावर जात आहेत. दोघेही रत्नागिरीतील चिपळूणमध्ये जाऊन पाहणी करणार आहेत. आदित्य ठाकरे हे नितीन राऊत यांना पनवेलमध्ये भेटतील. तिथून दोन्ही नेते चिपळूणला रवाना होत आहेत.

लोकांच्या घरापर्यंत वीज कशी द्यावी, मदत कशी पोहोचवावी यासाठी हा दौरा आहे. लोकांची सेवा करणे, ब्लॅंकेट, खाण्याच्या गोष्टी पुरवणे आणि सोलर लाईट देण्याचा कार्यक्रम आहे. बऱ्याच गोष्टी ८० टक्के पूर्ण केल्या आहेत, २० टक्के बाकी आहेत. कर्मचाऱ्यांना बरीच तारेवरची कसरत करावी लागली. आज कोकणात जाऊन पाहणी करणार आहे. आदित्य ठाकरे सुद्धा असतील असा निरोप मिळाला आहे, असं नितीन राऊत यांनी सांगितलं आहे.

नितीन राऊत या दौऱ्यात वीज यंत्रणेच्या दुरुस्तीचा आढावा घेणार आहेत. अतिवृष्टीमुळे महावितरण आणि महापारेषणच्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील वीज यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले आहे. “कोकणात मोठ्या प्रमाणात महापुराने आणि अतिवृष्टीनी मोठं नुकसान झालं आहे. त्या भागात जीवितहानीही झाली आहे. अजूनही त्या भागात पाऊस पडतो आहे, हवामान खात्याने अजून चार-पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र लोकांच्या घरापर्यंत वीज कशी नेता येईल, यासाठी प्रयत्न सुरु आहे. त्यासाठीच आजचा दौरा आहे”, असं नितीन राऊत म्हणाले.

लोकांची सेवा करणे, त्यांना मदतीचा हात देणे, हे सुद्धा काम माझ्या खात्याच्या वर्कर्स युनियनने सुद्धा हाती घेतलं आहे. ते सुद्धा त्या ठिकाणी सगळे कामाला लागले आहेत. मला वाटतं की बऱ्याच गोष्टी 80% आम्ही पूर्ण केल्या आहेत. 20% कामं राहिली आहेत, परंतु हे काम करत असताना जे आमचे तांत्रिक कर्मचारी आणि अधिकारी होते, त्यांना आपल्या जीवाची बाजी लावा लागली. अनेकदा भरपावसात वारा, वादळामध्ये त्यांना पोलवर चढावे लागले. त्यांना कसरत करावी लागली आणि अशा प्रसंगी त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी माझा हा दौरा आहे, असं नितीन राऊत म्हणाले.

डॉ. राऊत हे दौऱ्यात चिपळूण तालुक्यातील खेर्डी, वशिष्ठी नदीपूल परिसर तसेच मुरादपूर या प्रत्यक्ष काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन वीज कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार असून त्यांच्या अडचणीही जाणून घेणार आहे. तसेच प्रभावित क्षेत्रातील भागात दुरूस्तीसाठी त्वरित साहित्य आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी महावितरण व्यवस्थापनाला दिल्या आहेत. या दौऱ्यात ते पूरग्रस्त गरजवंताना जीवनावश्यक साहित्याचे वाटपही करणार आहेत. याशिवाय माध्यम प्रतिनिधींशीही संवाद साधणार आहेत.

शरद पवार म्हणाले दौरे टाळा, मात्र नातवाचा कोकण दौरा सुरु!

(२७ जुलै) त्यांनी कोकणातील खेडचा दौरा केला. तिथे झालेल्या नुकसानीही पाहणी केली. तर, (२८ जुलै) त्यांनी पोलादपूरचा दौरा केला. तसेच, नागरिकांना मदतीचे आश्वासन दिले आहे. एकीकडे शरद पवारांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी सोडून दौरे टाळावेत. याचं कारण असं की तेथील प्रशासकीय यंत्रणा तुमच्यामागे लागते आणि तेथील मदतीची कामं खोळंबतात. पण, त्यांच्या नातवानेच म्हणजे रोहित पवारांनीच त्यांच्या आदेशाचे आणि सल्ल्याचे पालन न केल्याचं दिसून येत आहे.

शरद पवार काय म्हणाले होते?

माझा पूर्वीचा अनुभव, विशेषत: लातूरच्या भूकंपा वेळचा अनुभव आहे. अशा घटनानंतर अनेक लोक गाड्या घेऊन त्या ठिकाणी जातात. माझं आवाहन आहे, आता शासकीय यंत्रणा पुनर्वसनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यांचे लक्ष विचलित होईल, त्यामुळे अनावश्यक दौरे टाळावे. मी लातूरला असताना, आम्ही सगळे जण कामात होतो, पंतप्रधान येत होते. त्यावेळी मी पंतप्रधानांना सांगितलं दहा दिवस येऊ नका. तुम्ही आला तर यंत्रणा तिकडे लावावी लागेल, मला आनंद आहे, माझी विनंती मान्य केली ते दहा दिवसानंतर आले. कोणत्याही नेत्यांनी प्रसंगावधान राखावं. मी सुद्धा आता दौऱ्यावर जात नाही. त्याचं कारण बाकीची यंत्रणा फिरवावी लागते. आपल्या भोवती यंत्रणा ठेवणं योग्य नाही. दौरे होत आहेत त्याने धीर मिळतो . पण दौऱ्यामुळं शासकीय यंत्रणेचं काम वाढतं. त्यामुळं दौरे होऊ नये असं मला वाटतं. दौऱ्याला गेल्यामुळं यंत्रणेला त्रास होतो, असं शरद पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत पावसाने धरला जोर

News Desk

भाजपची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर, खडसे-मुंडेंबाबत पक्षाचा हा निर्णय

News Desk

मी गैरजबाबदार असा पुरस्कार शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला पाहिजे – किरिट सोमय्या  

News Desk