HW News Marathi
महाराष्ट्र

निवडणुकीचा तेवढा आम्ही विचार करत नाही तर त्यापुढे जाऊन काम करतो – आदित्य ठाकरे 

मुंबई | पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली MMRDA मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत वरळी-शिवडी कनेक्ट ब्रीज, कफ परेड प्रकल्पाविषयी चर्चा झाली. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेने जी वचनं दिली आहेत ते आम्ही पूर्ण करुन दाखवणार. निवडणुकीचा तेवढा आम्ही विचार करत नाही. अर्थात निवडणूक ही लढावी लागते. त्यासाठी आपण मेहनत घेतो. पण त्यापुढे जावून जेव्हा आपण जिंकून येता तेव्हा मधल्या पाच वर्षाच्या कालावधीत असतो. या पाच वर्षात लोकांना जी वचनं दिली असतात त्यांची कामं करायची असतात”, अशी भूमिका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली आहे.

“आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक अडीच ते पाच वर्षात विविध पातळीवर निवडणूक होत असतात. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात ठेवून महापालिकेचं बजेट सादर होणार नाही. मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने बजेट सादर होईल. केंद्राच्या बजेटवर काही लोकांच्या प्रतिक्रिया प्रसारमाध्यांसमोर बघितल्या. निवडणुका नाहीत त्या राज्यांमध्ये जास्त तरतूद करण्यात आलेली नाही. निवडणुका लक्षात घेऊन काही राज्यांमध्ये जास्त तरतूद करण्यात आली आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

“मुंबई महापालिका मुख्यालय पर्यटकांसाठी खुलं करण्याचा निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण मुख्यालयाची वास्तू बघितली. तेव्हा महापालिका मुख्यालयाच्या वास्तूवर सर्वात वरच्या मजल्यावर देशातील सर्वात एक नंबरचं शहर, असं लिहिलं होतं. तो दर्जा कायम राहिल, असंच बीएमसीचं बजेट यईल. मला याबाबत खात्री आहे”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आदित्य ठाकरेंचे कौतुक केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात इमारतीला आग, कोणतीही जीवीतहानी नाही

News Desk

मराठा आरक्षणाबाबतीत सरकारच्या भूमिकेत सुरूवातीपासूनच समन्वय नव्हता – संभाजीराजे

News Desk

‘राजकीय संन्यास घेण्याची वेळचं येणार नाही,पुढची २५ वर्षे राजकारणात राहणार’

Ruchita Chowdhary