HW News Marathi
Covid-19

यूजीसीला एवढेच सांगत आहोत की लाखो जीवांशी खेळू नका – आदित्य ठाकरे

मुंबई | महाराष्ट्र सरकराने विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्ष परिक्षा रद्द करण्याची मागणी वारंवार केली आहे, सरकार परिक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे . मात्र केंद्र सरकारच्या निर्णयानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कोरोनाकाळातही घेतल्या जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात आता महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. UGC ने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाला आव्हान देत राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयासमोर याचिका दाखल केली आहे. परंतु कोर्टाने अद्याप ही याचिका सुनावणीसाठी स्वीकारलेली नाही.

यासाठी अनेक स्तरांतून आदित्य ठाकरे यांना पाठिंबा मिळाला. याच बाबतीत आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत युवक काँग्रेसने जो पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. ‘युवासेनेने सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेला आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिलेल्या समर्थनासाठी मी त्यांचे आभार मानतो. हा लढा प्रत्येक विद्यार्थ्याचा आहे, शिक्षकांचा आहे. आम्ही तिन्ही युवा आवाज, यूजीसीला एवढेच सांगत आहोत की लाखो जीवांशी खेळू नका’, असे ट्विट त्यांनी केले आहे.

 

यूजीसीच्या परीक्षा व शैक्षणिक कॅलेंडरच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार देशातील विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षा न घेण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चार केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र काँग्रेसने ४ हजार ६२७ स्थलांतरित मंजुराचा उचलला खर्च

News Desk

जगात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ७० लाखांच्या पुढे

News Desk

#NisargaCyclone : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेला संबोधित करणार

News Desk