HW News Marathi
महाराष्ट्र

दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनातही भाजप आक्रमक राहणार!

मुंबई | विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज (३० जून) भाजप नेत्यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक पार पडली. यावेळी दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला कोण-कोणत्या विषयांवर कोंडित पकडायचं, या मुद्द्यावर प्रामुख्याने चर्चा झाल्याचं कळतंय. शेतकरी, कोरोना ते आरक्षण अशा सर्व विषयांना न्याय देण्याबाबत आम्ही रणनिती ठरवल्याचं या बैठकीनंतर आमदार आशिष शेलार यांनी सांगितलं.

राज्यासमोर अनेक महत्वाचे प्रश्न आहे. संपूर्ण अधिवेशन झालं असतं तर सर्व विषयांना न्याय देता आला असता. पण सरकारनं यापेक्षा अजून छोटं अधिवेशन ठेवता येत नाही की काय म्हणून दोन दिवसांचं अधिवेशन ठेवलं आहे, असा टोला शेलार यांनी लगावलाय. त्याचबरोबर अधिवेशनाच्या दोन दिवसांत शेतकरी, कोरोना ते आरक्षण या मुद्द्यांवर सरकारला प्रश्न विचारण्याचं काम आम्ही करु, असं शेलार म्हणाले. त्यामुळे दोन दिवसाच्या अधिवेशनातही सरकारला कोंडित पकडण्याची रणनिती भाजपनं आखल्याचं दिसून येत आहे.

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रणनिती

नांदेडच्या देगलूर विधानसभा मतदारसंघातील आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीतही पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीप्रमाणेच विजय मिळवण्याचा निर्धार भाजपनं केलाय. त्यासाठीही या बैठकीत रणनिती आखण्यात आल्याचं शेलार यांनी म्हटले आहे.

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक, मलिकांचा दावा

आमदारांचे कोरोना रिपोर्ट आल्यावर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा अंतिम निर्णय होईल. मात्र, आम्ही विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मताने जिंकू, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…म्हणून फडणवीसांनी जोडले मुख्यमंत्र्यांसमोर हात

News Desk

“कोणताही शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेणार नाही”

News Desk

“मुख्यमंत्री समाजामध्ये व प्रांतांमध्ये तेढ निर्माण करत आहेत!”, भाजप मंत्र्यांचा आरोप

News Desk