HW News Marathi
महाराष्ट्र

नितेश राणे चाराण्यासारख्या गोष्टी करतात, सत्तारांची टीका

वर्धा | राज्य सरकारने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते नारायण राणे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली. यावरुन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने टीका केली आहे. युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना एक्स दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आली यावरुन सेनेला आणि ठाकरे सरकारला टार्गेट करण्यात आले. याच गोष्टीवरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “नितेश राणे हे पहिले हँग आहेत. त्यांना काही कळत नाही आणि ते चाराण्यासारख्या गोष्टी करतात”, असा घणाघात त्यांनी केला आहे.

“चाराण्यासारख्या गोष्टी करणाऱ्यांनी अशाप्रकारे बोलावं याचं मला आश्चर्य वाटतंय. कोणाला सुरक्षा द्यावी कोणाला नाही द्यावी हे शासन ठरवेल. अभिनेत्री कंगणा राणावतला सुरक्षेची किती गरज होती? हे आपण केंद्र सरकारला विचारलं पाहिजे. कंगणाला अशी सुरक्षा दिली की तशी महाराष्ट्रात मंत्र्याला सुरक्षा नाही. कंगणाला मंत्र्यापेक्षाही जास्त सुरक्षा देण्यात आली. सुरक्षेची कुणाला आणि किती आवश्यकता आहे? याचा रिपोर्ट प्रशासन देते, त्यानुसार सुरक्षा दिली जाते”, अशी प्रतिक्रिया सत्तार यांनी दिली आहे.

नितेश राणे नेमकं काय म्हणाले होते?

“सरदेसाईंच्या मुलाला सुरक्षा देऊन महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचं आणि योग्य पाऊल उचललं आहे. त्याला जास्त सुरक्षेची नितांत गरज होती. कारण त्याने मंत्रालयातील अनेक फाईल्स दाबून ठेवल्या आहेत. त्यामुळे अनेक नोकरशाह त्याच्यावर नाराज आणि संतापलेले आहे. त्यामुळे त्याला सुरक्षा पुरवण्याची खऱ्या अर्थाने गरज होती”, असं ट्वीट करत नितेश राणे यांनी सरकारच्या सुरक्षाव्यवस्थेतील बदलांवरुन टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी जे बोलतो ते खरे बोलतो आणि सांगून करतो, अजित पवारांचा भाजपला इशारा

News Desk

नागपूरमध्ये शाळा १४ डिसेंबरपासून सुरू होणार

News Desk

आता मुंबईच्या डबेवाल्यांनाही हक्काची घरे मिळणार

swarit