HW News Marathi
महाराष्ट्र

फक्त सरकार विरोधात बोलण्यासाठी राणेंना केंद्राचा लाडू मिळाला, गुलाबराव पाटलांनी सुनावलं

जळगाव | शिवसेना, ठाकरे सरकार यांच्यावर कायम टीका करणारे भाजपचे नेते नारायण राणे यांना मोदींच्या केंद्रिय मंत्रीमंडळात जागा मिळाली. दरम्यान, कोकणात पूर परिस्थितीमुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं. या भागाची पाहणी करण्यासाठी नारायण राणे दिल्लीहून कोकणात आले होते. पाहणी केल्यानंतर त्यांनी ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याचं प्रत्यूत्तर शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना मोठा लाडू भेटल्यामुळे त्यांना बोलणे गरजेचे आहे, बोलण्याकरताच त्यांना मंत्री केले आहे, ही चाबी भरल्याशिवाय हे खेळणे चालत नाही असे वक्तव्य पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. चोपडा उपजिल्हा रुग्णालयात काल २ कोटी ४ लक्ष ५० हजार किंमतीचे ऑक्सिजन जनरेशन प्लांट भूमिपूजन सोहळा सकाळी १०.०० वाजता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले.

नारायण राणे यांनी केली होती टिका

मुख्यमंत्र्यांनी लोकांना तत्काळ मदत केली पाहिजे होती; पण या राज्यात मुख्यमंत्रीपण नाही आणि प्रशासनही नाही. चिपळूणमधील लोकांचे स्थलांतर केले नाही, जेवणाची व्यवस्था केली नाही. मग प्रशासन काम करते, असं कसं म्हणायचे, यास चिपळुणातील प्रशासन बेजबाबदार आहे. एक केंद्रीय मंत्री असताना सोबत राज्याचे विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असतांना पूरग्रस्त पाहणी दौऱ्यामध्ये एकही अधिकारी उपस्थित राहत नाही. आढावा बैठकीला एकही अधिकारी उपस्थित नाही. अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली होती.

राणेंचे म्हणणे चुकीचे

काल चोपडा उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांट भूमिपूजन प्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खोचक टिकेवर बोलते केले असता ते बोलत होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, राज्य चालविता येत नसेल व प्रशासन नाही असे म्हणणे पुर्णतः चुकीचे आहे. तलाठी ग्रामसेवक तहसीलदार प्रांत जिल्हाधिकारी पोलीस प्रशासन हे सर्व मैदानात असून सर्वतोपरी मदतकार्य करीत आहेत नारायण राणे यांचे म्हणणे अतिशय चुकीचे आहे.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने कोरोना आला परंतु कोकणात पाऊसही भरपूर आला असे म्हणायला काय हरकत आहे. यावर एकच हशा पिकला होता.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाये संविधान’,वडूजमध्ये अभियानाची सांगता ! 

News Desk

‘मातोश्री’ जवळ मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला; रेकी करण्याचा शिवसैनिकांचा आरोप

Aprna

“भगव्याला हात लावाल तर झेंडा खिशात ठेवून दांडा घालू”, राऊतांचा कन्नडिगांना इशारा

News Desk