HW News Marathi
महाराष्ट्र

दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यावर 3700 कोटी जमा होणार विजय वडेट्टीवार यांची माहिती

नागपूर। राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत देण्याचा सरकारचा निर्णय आहे, अशी माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या संदर्भात प्रयत्न केले आहेत. वित्त आयोगाकडून आज आमच्या मदत व पुनर्वसन खात्याकडे निधी वर्ग केला जाईल. दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात गेला पाहिजे. हा निधी रब्बी हंगामाच्या उपयोगी पडावा, खरिप तर गेला आहे. रब्बी हंगामाच्या कामासाठी हा निधी वापरला जावा, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

3700 कोटी रुपयांचा निधी

55 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती सर्वेक्षणातून आली आहे. सर्वाधिक 70 टक्के नुकसान मराठवाड्यात झालेलं आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात आणि इतर जिल्ह्यातही नुकसान झालं आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं आणि सर्वाधिक गरज मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 3700 कोटी रुपयांचा निधी वाटला जाईल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

सगळ्यांची घर काचेची आहेत

ईडीची पुढची कारवाई नांदेडला होणार असल्याचे संकेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यावरून कॉंग्रेसचे मदत आणि पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाटील यांना आव्हान दिले. विजय वडेट्टीवार म्हणाले, नांदेड की बारी…. काही हरकत नाही, उद्या तुमची बारी असेल. सत्ता कोणाच्या बापाची नेहमीसाठी नसते लक्षात ठेवा. सत्ता बदलत असते आणि सगळ्यांची घर काचेची आहेत. किमान खिडकी तरी काचेची असते. दगड तर पडणार…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मराठा क्रांती मोर्चा’चा राजकारणासाठी वापर करणाऱ्यांना धडा शिकवू !

News Desk

बॉलिवूड इंडस्ट्री मुंबईबाहेर नेणे हे काय खिशातलं पाकीट मारण्याइतकं सोपं आहे का? योगींचा सवाल

News Desk

शाळेत गैरहजर असलेल्या डिसले गुरुजींनी शाळांचा दर्जा कसा उंचावला?, शिक्षणाधिकाऱ्यांचा आरोप

News Desk