HW News Marathi
महाराष्ट्र

पॅन कार्ड,आधार कार्ड ऑनलाईन जोडा

मुंबई पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणी कऱण्यासाठी प्राप्तिकर विभागाने आता एक नवीन ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे. यासाठी incometaxindiaefiling.gov.in या लिंकवर क्लिक जाऊन विषेश पर्यायावर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरल्यास लगेच ना्गरिकांचे पॅन कार्ड आणि आधआर कार्ड एकमेकाशी जोडले जाईल.

या पर्यायी क्लिकवर नागरिकांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबर द्यावी लागेल . यानंतर आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात युआयडीएआयकडून या माहितीची पडताळणी केली जाईल. आधार कार्डावरील नाव आणि नागरिकाने वेबसाईटवर दिलेले नाव यात मोठी तफावत आढळल्यास वन टाईम पासवर्डची(ओटीपी) गरज भासेल. मोबाईल क्रमांक आणि ई-मेलद्वारे हा क्रमांक कळविला जाईल.

या पर्यायावर क्लिक करुन ग्राहकाला आपला पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि आधार कार्डाची माहिती द्यावी लागेल. यानंतर युनिक प्राप्तिकर आणि प्राप्तिकर परतावा (टॅक्स रिटर्न) भरण्यासाठी देखील आपल्याला आधारकार्ड आणि पॅन कार्डला एकमेकांशी जोडणे आवश्यक आहे. विनाअडथळा जोडणीसाठी पॅन आणि आधार कार्डावरील जन्मतारीख सारखीच असावी. त्याचप्रमाणे या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्राप्तिकर खात्याच्या वेबसाईटवर लॉग-इन करण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती प्राप्तीकर विभागाने दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अमरावती शिवसेनेत वाद, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावली बैठक

News Desk

बारामतीत १ कोरोना पॉझिटिव्ह, महाराष्ट्रात संख्या २०४ वर पोहोचली

swarit

भाजपचे उमेदवार अमरीश भाई पटेल यांचा ३३२ मतांनी दणदणीत विजय

News Desk
राजकारण

‘आई-वडील हे साक्षात परमेश्वर तर प्रत्येक स्त्री ही साक्षात लक्ष्मी आहे’ | राम कदम

News Desk

मुंबई | “मी यापूर्वीही महिलांची माफी मागितली आहे. आता पुन्हा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून माता – भगिनींची बिनशर्त माफी मागतो. तसेच मी आयोगाला विश्वास देऊ इच्छितो की आई-वडील हे साक्षात परमेश्वर आहेत आणि प्रत्येक स्त्री ही साक्षात लक्ष्मी आहे, हा संदेश रुजविण्यासाठी मी भविष्यात कायम प्रयत्न करीत राहीन,” असे राम कदम यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे माफी मागत म्हटले आहे.

दरम्यान, भाजप आमदार राम कदम यांच्या या माफीनाम्यावर कायदेशीर सल्ला घेऊन त्यानंतरच योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती विजया रहाटकर यांनी स्पष्ट केले आहे. दहीहंडी उत्सवात स्त्रियांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल भाजप आमदार राम कदम यांनी आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे माफी मागितली आहे. त्याचप्रमाणे या पुढे देखील महिलांचा सन्मान वाढेल यासाठी ते कायम कार्यरत राहतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला आहे.

राम कदम यांच्या वादग्रस्त विधानानंतर आयोगाने त्यांना 5 सप्टेंबर रोजी आपले म्हणणे आठ दिवसांत सादर करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार राम कदम यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे लेखी खुलासा सादर करून महिलांची माफी मागितली आहे. महिलांविषयक कोणतेही वक्तव्य करताना आमदार कदम यांनी काळजी घ्यायला हवी होती, असे आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटले आहे.

Related posts

#LokSabhaElections2019 : …तर मग मोदींनी सर्वच ४२ मतदारसंघातून निवडणूक लढवावी !

News Desk

कर्नाटकामध्ये लोकशाही आणि प्रामाणिकपणाचा पराभव !

News Desk

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का,  माजी पाणीपुरवठा मंत्री शिवसेनेत करणार प्रवेश ?

News Desk