HW News Marathi
महाराष्ट्र

पांडुरंगाच्या ” रिंगण ” सोहळ्यासाठी एस.टी.च्या जादा बसेस

पंढरपूर | पंढरपूर येथे आषाढी एकादशीसाठी आलेल्या भाविक प्रवाश्यांना २१ जुलै (नवमी) रोजी बाजीराव विहीर येथील शेवटचा रिंगण सोहळा अनुभवण्यासाठी पंढरपूर येथील चंद्रभागा बसस्थानक ते बाजीराव विहीर दरम्यान एस.टीच्या तब्बल १०० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

आषाढी वारीच्या पूर्वतयारी निमित्त परिवहन व खारभुमी विकास मंत्री तथा , एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी स्थानिक पत्रकारांनी केलेल्या सुचनेला प्रतिसाद देत एसटी प्रशासनाला रिंगण सोहळयासाठी जादा बसेस सोडण्याचे निर्देश दिले होते.त्या नुसार सकाळी ६ वाजल्यापासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुमारे 100 बसेसच्या 500 हून अधिक फेऱ्या करणार असून याकरिता एकेरी तिकीट भाडे रु २० इतके असेल. तर भाविक प्रवाशांनी या सेवेचा फायदा घ्यावा असे अवाहन एस.टी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सगळ्यांसाठी मुंबई लोकल लवकर सुरु करण्याचा सरकारचा विचार!

News Desk

“मुंबईच्या बत्तीगुल विषयावर बोलून स्वतःचं हसं करून घेऊ नये”, अनिल देशमुखांचा बावनकुळेंना सल्ला

News Desk

खोटी आकडेवारी देऊन फसवणूक केल्याबद्दल सरकारने राज्यातील जनतेची माफी मागावीः सचिन सावंत

News Desk