HW News Marathi
महाराष्ट्र

आपल्या पाल्याला कोरोना होण्याची भीती असेल तर शाळेत पाठवू नये – अदिती तटकरे

रायगड | राज्यात कालपासून (२३ नोव्हेंबर) इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु झाल्या आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, पालकांना आपल्या पाल्यांना कोरोना होण्याची भीती वाटत असेल तर त्यांनी पाल्यांना शाळेत पाठवू नये, असे वक्तव्य क्रीडा आणि युवक कल्याण विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे. त्या रोहा येथे एका कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या.

“पालकांनी भीतीच्या वातावरणात आपल्या मुलांना शाळेत पाठवू नये. पालकांच्या मनात भीती असल्यास त्यांनी आपल्या पाल्याला घरीच ऑनलाईन पद्धतीने शिक्षण द्यावे” असे अदिती तटकरे म्हणाल्या. तसेच, कोणत्याही विद्यार्थ्याचा शैक्षणिक वेळ वाया जाऊ देऊ नये, असे आवाहन त्यांनी पाल्यांना केले आहे.

कालपासून राज्यातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. यावेळी शाळा सुरु होण्यापूर्वी शिक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले होते. त्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यात शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. या चाचण्यांनंतर उस्मानाबाद, नांदेड, नागपूर, बीड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर अशा जिल्ह्यांमध्ये शेकडो शिक्षकांना कोरना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते.

दरम्यान, शिक्षकांनाच कोरोनाची लागण झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक संभ्रमावस्थेत आहेत. तसेच राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुलांना शाळेत पाठवणे योग्य होईल का?, असा प्रश्नही पाल्यांच्या मनात येत आहे. त्यामुळे पालकांच्या मनातील भीतीचे वातावरण पाहता, पालकांना भीती वाटत असेल तर त्यांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवू नये, असे वक्तव्य अदिती तटकरे यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पहिल्या पावसात पैनगंगेला दुथंडी

swarit

राज्यात एकूण चार टप्प्याच्या निवडणुकीत ६०.६८ टक्के मतदान

News Desk

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

News Desk