HW News Marathi
देश / विदेश

४०० वर्ष जुन्या वटवृक्षाला वाचवण्यासाठी पर्यावरण मंत्र्यांचे केंद्रीय परिवहन मंत्र्यांना पत्र

मुंबई | पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पत्राद्वारे एक मागणी केली आहे. सध्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. याचा फायदा मिरज, सांगलीत या शहरांतील गावांना नक्कीच होणार आहे. मात्र, या महामार्गाच्या कामात येणारे ४०० वर्षे जुन्या वटवृक्षाला वाचवण्यासाठी सांगलीतील वृक्ष प्रेमींनी आंदोलन सुरू केले आहे.

रत्नागिरी, कोल्हापूर, मिरज, सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू असून, महामार्गाच्या नियोजित कामात मिरज तालुक्यातील भौसे गावाच्या हद्दीत असलेले ४०० वर्षे जुने वडाचे येत आहे. कामात अडथळ येत असल्याने हे झाड तोडण्यात येणार असून, त्याला वृक्ष प्रेमी नागरिकांनी विरोध केला आहे. यासंदर्भात आंदोलन सुरू करण्यात आले असून, वटवृक्ष तोडू नये, अशी मागणी केली जात आहे.

त्यामुळे सदर वटवृक्षाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन तसेच परिसरातील होणाऱ्या ऱ्हासाचा विचार करता भोसे येथील संबंधित जागेवरील महामार्गाचे संरेखन (मार्ग बदलून) काही प्रमाणात बदलून वटवृक्षाचे जतन होण्याबाबत कार्यवाही करावी,” अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना पत्राद्वारे केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भूपेन हजारीकांच्या कुटुंबीयांचा ‘भारतरत्न’ स्वीकारण्यास नकार

News Desk

 मुंबई विमातळावर भारतीय हवाई दलाचे मालवाहक विमान धावपट्टीवरून घसरले

News Desk

आजपासून फास्ट टॅग नसेल तर भरा दुप्पट टोल…!

News Desk