HW News Marathi
Covid-19

आमच्या अन् मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ‘सामाना’ने पुन्हा नवा अग्रलेख लिहावा ! 

मुंबई | “आम्ही प्रथम आमची भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडू. आमची भूमिका ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे देखील समाधान होईल. त्यानंतर मग ‘सामना’ने पुन्हा नवा अग्रलेख लिहावा”, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील महाविकासाआघाडी सरकारमधील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसमधील मंत्री-नेतेमंडळी प्रचंड नाराज असल्याची चर्चा आहे. काँग्रेस नेत्यांच्या अंतर्गत बैठकीनंतर आता त्यांची मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा होणार आहे. दरम्यान, अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या नाराजी नाट्यावर भाष्य करत आज (१६ जून) शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये काँग्रेसवर घणाघाती टीका करण्यात आली. यावर बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले आहे.

“आम्ही भक्कमपणे महाविकासआघाडीसोबत आहे. खाटेचे कुरकुरणे आधी ऐकून घ्यावे. आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडू. आमचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे समाधान होईल. आज किंवा उद्या आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू. त्यानंतर मग ‘सामना’ने पुन्हा नवा अग्रलेख लिहावा. अपूर्ण माहितीच्या आधारावर आमच्याबद्दल चुकीचा संदेश लिहिला जातो आहे. आम्ही कोणत्याही बदल्यांसाठी आग्रही नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचेच निर्णय व्हावेत हीच आमची अपेक्षा आहे. त्यासाठीच आम्ही बैठकीची मागणी केली होती”, असे बाळासाहेब थोरात यांनी आपल्या मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून जी माहिती समोर येते आहे त्यानुसार महाविकासआघाडी सरकारच्या निर्णयप्रक्रियेत शिवसेना-राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसच्या नेत्यांना आवश्यक ते अधिकार मिळत नसल्याने महाराष्ट्र काँग्रेस अस्वस्थ आहे.

‘सामना’चे संपादकीय

सामनाच्या अग्रलेखात म्हटले, “कोविडच्या संकटात संपूर्ण प्रशासन झुंज देताना दिसत आहे. तरीही चव्हाण-थोरातांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांनी ऐकून घ्यायलाच हवे. कारण सरकारचा तिसरा पाय काँग्रेसचा आहे. राज्यपाल नियुक्त 12 विधान परिषद जागांच्या समान वाटपाचा मुद्दा आहे. तो विषय काही कुरबुर किंवा कुरकुरीचा नाही, विधान परिषदेच्या जागेवरून काँग्रेस कुरबुर करत आहे”, असे म्हणत सामनाच्या अग्रलेखात टीका केली आहे.

“काँग्रेसचे नेमके म्हणणे काय आहे? राजकारणातील ही जुनी खाट महाराष्ट्रात कुरकुरू का लागली आहे? आमचे ऐका म्हणजे काय? यावरही आता झोत पडला आहे. थोरात व चव्हाण हे काँग्रेसचे अनुभवी नेते आहेत व त्यांना सरकार चालविण्याचा दांडगा अनुभव आहे. मात्र त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की, असा दांडगा अनुभव शरद पवार व त्यांच्या पक्षाच्या लोकांपाशीही आहे. तथापि कुरकुर व कुरबुर होताना दिसत नाही”, असे म्हणत ‘सामना’मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार कोरोना पॉझिटिव्ह 

News Desk

लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन अधिकाऱ्यांनी काम करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

News Desk

“पुण्यात लॉकडाऊन करा”, मुंबई उच्च न्यायालयाची उद्धव ठाकरेंना सूचना!

News Desk