HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर, विरोधकांच्या मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई | मंत्रालयात विष प्राशन केलेले धर्मा पाटील यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. रविवार रात्री धर्मा पाटील यांनी जेजे रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर सरकावर विरोधांकानी कडाडून टीका करण्यास सुरूवात केली आहे. सरकारला लाज वाटते का अशी टीका सुप्रिया सुळे यांनी टिव्टरवर वरती केली आहे.

 

तर धनंजय मुंडे यांनी 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. धर्मा पाटील यांनी २२ जानेवारी रोजी मंत्रालयात विष प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी जेजे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र रविवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वस घेतला. यामुळे शेत-यांमध्ये सतापले असून सरकाच्या या हलगर्जीपणामुळे विरोधकांनीही सरकारवर कडाडून टीका करत कारावाईची मागणी करत आहे.

धुळेतील शेतकरी धर्मा पाटील यांचा मृत्यूनंतर त्यांच्या कुटूंबाला न्याय मिळवा यासाठी एकवटले आहेत. शेतक-यांनी रास्ता रोको आणि निषेध केले. तर मुंबईत धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी जे जे रुग्णालयात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सगळे मुहूर्त तुमचेच आहेत, नो कमेंट्स, राष्ट्रवादी प्रवेशावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

News Desk

हक्काच्या घरांसाठीचा संघर्ष विसरु नका, मिळालेली घरे विकू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्राचाळवासियांना भावनिक साद

Aprna

महिलांवरील अत्याचारासह सायबर क्राईम आमचे सर्वोच्च प्राधान्य – हेमंत नगराळे

Manasi Devkar