HW News Marathi
महाराष्ट्र

#CoronaVirus : दिलासादायक बातमी ! ५ जणांना डिस्चार्ज देण्याची शक्यता, राजेश टोपे

मुंबई | देशातसह राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाचे चित्र दिसून येत आहे. आता सद्ध राज्यात कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात वाढ होऊन ५२ वर गेली आहे. तर देशात कोरोनाग्रस्तांची आकाडा २०० पार झाला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे भितीचे वातावरण पाहायला मिळात. मात्र, राज्यासाठी आनंदाची गोष्टी म्हणजे ५ कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांची डिस्चार्ज करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज (२० मार्च) घेतलेल्या पत्रकार परिषेद सांगितले.

आरोग्यमंत्री म्हणाले की, मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येक १ रुग्ण पॉझिटिव्ही आढळून आल्याने राज्यात कोरोना बाधित रुग्णांची ५२वर आहे, अशी माहिती त्यांनी दिली. टोपे म्हणाले, “कोरोना बाधित जे रुग्ण हॉस्पीटलमध्ये दाखल झाले होते, त्यातील काही रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, ५ रुग्णांना डिस्चार्ज दिला जाईल. याचा अर्थ रुग्ण बरा होतो.त्यामुळे नागरीकांनी घाबरुन जावू नये..पण काळजी घ्यावी” अशी दिलासा देणार माहिती आरोग्यमंत्र्यानी दिली.

दरम्यान, महात्मा जोतिबा फुले आरोग्य जीवनदायी योजने अंतर्गत अतिदक्षतेचा कोरोना बाधित रुग्ण असेल त्याचा संपूर्ण खर्च सरकार करणार आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचे वेळोवेळी आवाहन केले आहे. कोरोना पार्श्वभूमीवर आतापर्यंत जी लक्षण आढळलेली प्रवासी ९७१ होते. एकूण १०३६ प्रवाशांची तपासणी करण्यात आलेली आहे.

जनता कर्फ्यूला सहकार्य करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

कोरोना पार्श्वभूमीवर पंतप्रधान यांनी जे काल आव्हान केले आहे, रविवारी (२२ मार्च) सेल्फ कर्फ्यु ची घोषणा करण्यात आली आहे त्याला जनतेने १०० टक्के प्रतिसाद दिला पाहिजे, या आजारातून मुक्त होण्यासाठी नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, आरोग्यमंत्र्यांनी मोदींच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्यातील जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री आज पुन्हा संवाद साधणार असल्याची माहिती देखील आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा रद्द

News Desk

अपघातग्रस्तांवर वेळीच प्रथमाेपचार करुन जीव वाचविणारे खरे देवदूत! – अनिल परब

Aprna

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पूर्ण केली ६ वर्षीय संचितची इच्छा!

News Desk