HW News Marathi
महाराष्ट्र

#CoronaVirus | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५२ वर

मुंबई | जगभरात सध्या कोरोना व्हायरसने मोठे थैमान घातले आहे. देशासह राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडाही अद्याप वाढतच आहे. आतापर्यंत संपूर्ण देशातील एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२० मार्च) सकाळी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील सद्यस्थितीबाबत माहिती दिली. “राज्यात आज ३ कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाल्याने राज्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ५२ झाली आहे”, असे राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड येथे कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता १९५ वर पोहोचली आहे. दरम्यान, रुग्णांचा आकडा जरी वाढता असला तरीही कोरोनानंतरही रुग्ण बरा होऊ शकतो, असेही राजेश टोपेंनी म्हटले आहे.

राजेश टोपे यांनी आज झालेल्या या पत्रकार परिषदेत एक दिलासादायक माहिती देखील दिली आहे. “राज्यात जे कोरोनाग्रस्त आहेत त्यापैकी ५ जणांना डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांना आणखी काही दिवस होम क्वारेंटाइन राहावे लागेल. त्यामुळे मी राज्यातील जनतेला सांगू इच्छितो की, नागरिकांना घाबरून जाऊ नये. कोरोना झाल्यानंतरही रुग्ण बरे होतात”, असे राजेश टोपे यावेळी म्हणाले. “पंतप्रधान मोदी यांनी काल जी जनता कर्फ्युची केली आहे त्याला जनतेने १००% प्रतिसाद दिला पाहिजे”, असे आवाहनही यावेळी राजेश टोपेंनी केले आहे. त्याचप्रमाणे, आता सध्या आपण राज्यात ६ लॅब्समध्ये टेस्ट करत असलो तरी येणाऱ्या दिवसात ही संख्या १२ होईल अशी माहिती, राजेश टोपेंनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

३६ जिल्ह्यांना आमदार रोहित पवारांकडून मदतीचा हात

News Desk

आता थेट शेतकरी मोबाईल ॲपद्वारे करणार पिकांची नोंदणी, बाळासाहेब थोरातांची माहिती!

News Desk

कुलाबा, ठाणे, अमरावती येथील वैद्यकीय महाविद्यालयांच्या एमबीबीएस, एमडी अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ! – अमित देशमुख

Aprna