HW News Marathi
महाराष्ट्र

“वर्षभर शिक्षण ऑनलाईन मग परीक्षा ऑफलाईन का?”, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

मुंबई । “वर्षभर शिक्षण ऑनलाईन मग परीक्षा ऑफलाईन का? असा सवाल करत राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा ऑफलाईन परीक्षांना विरोध केल्याचे दिसून आले आहे. येत्या २३ एप्रिलपासून राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षा सुरू होत आहेत. मात्र, या परीक्षांच्याविरोधात आज (२ एप्रिल) मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यानी आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले आहे.

शिवाजी पार्क येथे आंदोलन करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्यायला विरोध केला असून दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षाही ऑनलाईन पद्धतीनेच घ्याव्यात अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. या मागणीसाठी मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील विद्यार्थी एकत्र आले आहेत.

दादर शिवाजी पार्क येथील आंदोलक विद्यार्थ्यांची गर्दी पाहता या परिसरात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आल्या असून पोलिसांच्या ४ गाड्या आंदोलनस्थळी दाखल झाल्या. त्याचप्रमाणे, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहितीही समोर येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शांतता, स्थैर्य आणि सुरक्षेसाठी केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद! – UNचे सरचिटणीस एच.ई.अँटोनियो गुटेरेस

Aprna

ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत हिची चौकशी केली जाणार – गृहमंत्री

News Desk

राज्यातील सर्वसामान्य नागरिक हाच आरोग्यविषयक योजनांचा केंद्रबिंदू! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna