HW News Marathi
महाराष्ट्र

अहमदनगर हत्याकांडाची केस फासट्रॅक कोर्टात चालवा

मुंबई | अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या हत्त्येनंतर जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांनी आंदोलन केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी अटक केली. अहमदनगर हत्याकांडाची चौकशी फासट्रॅक कोर्टात असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले. सोमवारी मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक बोलत होते.

यावेळी बोलताना नवाब मलिक म्हणाले, शिवसैनिकांच्या आंदोलनानंतर जगताप यांना अटक झाली. संग्राम जगताप यांना कोणतीही गुन्हेगारीची पार्श्वभूमी नाही त्यांची केस न्यायालयाने फासट्रॅक कोर्टात चालवून प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर लावावा. नगर हत्याकांड प्रकरणात जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना पोलीस यंत्रणा शोधून काढतील असेही या प्रकरणावर बोलताना नवाब मलिक म्हणालेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ.सलीम अली पक्षी अभयारण्य परिसर पक्ष्यांसाठी सुरक्षित करावा! – आदित्य ठाकरे

Aprna

नागपुरात काँग्रेस- भाजप कार्यकर्ते आमनेसामने…रूपांतर हाणामारीत!

News Desk

विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीतील विजय हा काँग्रेसवरच्या विश्वासाचे प्रतिक!

News Desk