HW News Marathi
महाराष्ट्र

सरकार म्हणजे बश्या बैल, यांना रुमण्याचा हिसका दाखवावाच -अजितदादा पवार

नांदेड ( उमरी ) – शेतकऱ्यांशी आणि शेतीशी या सरकारचा काहीच संबंध नाही. हे सरकार म्हणजे बश्या बैल आहे, यांना वठणीवर आणण्यासाठी एकदा तरी रुमण्याचा हिसका दाखवावाच लागेल असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित यांनी जनतेला केले. पक्षाच्या हल्लाबोल आंदोलना निमित्ताने आयोजित केलेल्या उमरी येथील सभेला संबोधीत करताना ते बोलत होते.

अजित पवार यांच्या भाषणाआधी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टिका केली. मुंडे म्हणाले की मुख्यमंत्री जरी म्हटले की ते शेतकरी आहेत तरी ते कोणत्याही बाजूने शेतकरी दिसत नाही. धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेत श्री अजितदादा पवार म्हणाले की, या सरकारमधील लोकांना गाय, बैल, रेडकू यातला फरक कळत नाही. यांना शेतीतले काहीच समजत नाही तेव्हा या सरकारला वठणीवर आणण्यासाठी एकदा तरी रुमण्याचा हिसका दाखवाच

या सभेला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी मंत्री अनिल देशमुख, नांदेड जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर, माजी खा. गंगाधररावजी कुंटूरकर, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादी महिला काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस सोनाली देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, ओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे, प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर आणि पक्षाचे इतर प्रमुख नेते उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे मराठी भय्ये माफी मागणार का?

News Desk

दोन नेते, दोन मेळावे, कोण गाजवणार मैदान?

Manasi Devkar

#CoronaVirus : राज्यातील खासगी डॉक्टरांनी भीतीपोटी दवाखाने बंद ठेवू नयेत, आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

swarit