HW News Marathi
महाराष्ट्र

लवकर जग कोरोनामुक्त होऊ दे, उपमुख्यमंत्र्यांचं विठुरायाकडे साकडं!

पंढरपूर | आज (२६ नोव्हेंबर) कार्तिकी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याहस्ते ही पूजा करण्यात आली. यावेळी अजित पवारांनी कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री विठ्ठलाच्या चरणी घातले. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सौ सारिका भरणे, मानाचे वारकरी कवडुजी भोयर, सौ कुसुमबाई भोयर, नगराध्यक्षा सौ. साधना भोसले, पार्थ पवार, जय पवार आदी उपस्थित होते.

“अवघ्या जगासमोर कोरोनाचे आव्हान आहे. आपण या आव्हानाला सक्षमपणे तोंड देत आहोत. पण गेला काही काळ करोना आटोक्यात आला, असे चित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांत करोनाचे रुग्ण परत वाढत आहेत. त्यामुळे आपणा सर्वांनाच काही बंधने पाळणे गरजेचे आहे. याबाबतीत समस्त वारकरी बांधवांचे आभार मानतो, कारण त्यांनी शासनाच्या आवाहनाला आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिक यात्रेतही प्रतिसाद दिला. राज्यातील समस्त नागरिकांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिीणी मातेची पूजा करण्याचे मला भाग्य मिळाले. पुढील वर्षी आषाढी आणि कार्तिक यात्रा प्रथा परंपरेनुसार होतील, असा विश्वास आहे,” असे अजित पवारांनी यावेळी सांगितले आहे.

“राज्यातील शेतकरी यंदाच्या वर्षी अतिवृष्टीने संकटात आला आहे. या शेतकऱ्यांच्या जीवनातील दुख: हलकं करण्याची ताकद शासनाला दे अशी मागणी विठ्ठलाकडे केली. विठ्ठल करोनाचे संकट दूर करेलच अशी समस्त भाविकांप्रमाणेच माझीही श्रद्धा आहे. पण सर्व काही पांडुरंगावर सोडून चालणार नाही. आपणा सर्वांना करोनाचा प्रसार टाळण्यासाठी मास्क वापरणे. गर्दी टाळणे, वारंवार हात धुणेआदी गोष्टी काटेकोरपणे अंमलात आणाव्या लागतील”, असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडे आणि माझ्यात गैर काही झालंच नाही, रेणू शर्माचा खुलासा

News Desk

मुंबई पोलीस दलात मोठे बदल, गुन्हे शाखेच्या तब्बल ६५ अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या

News Desk

मराठा आरक्षणाबाबत खंबीर, राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही- उदयनराजे भोसले

News Desk