HW News Marathi
महाराष्ट्र

नव्याचे नऊच दिवस असतात, अजित पवारांचा टोला

बारामती | “रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बारामतीच्या पाण्यावरून राजकारण पेटविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु नव्याचे नऊच दिवस असतात”, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना टोला लगावला आहे. माढ्याच्या खासदारपदावर येताच रणजितसिंह निंबाळकर यांनी नीरा डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे पाणी बंद करण्याची मागणी केली. तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचे आदेश दिल्याने राजकारण चांगलेच पेटले आहे. या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे माढ्याचे नवनिर्वाचित खासदार आहेत. खासदार होताच त्यांनी बारामतीचे पाणी अडविण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “पाणी हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे, बारामतीचेच काय कोणाचेही पाणी रोखणे चूकीचे आहे”, असे उद्धव ठाकरे ठाकरे म्हणाले. सत्ता कोणाचीही असली तरीही पाण्यावरून राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंगनाविरोधात केलेल्या आंदोलनामूळे शिवसैनिकांवर गुन्हा दाखल 

News Desk

रब्बी हंगामात सिंचनासाठी दिवसाही वीजपुरवठा होणार, उर्जामंत्र्यांची घोषणा

News Desk

‘नाणार प्रोजेक्ट’ प्रकल्पग्रस्त राज ठाकरेंना कृष्णकुंजवर आज भेटणार

News Desk