HW News Marathi
महाराष्ट्र

“हे देशाच्या जनतेचं दुर्दैव”, अजित पवार का संतापले?

पुणे | देशात कोरोनाचं संकट वाढतच चाललं आहे. यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदी सरकारला फटकारलं आहे. “अच्छे दिन आनेवाले है, म्हणून लोकांनी या सरकारला निवडून दिले. मात्र करोनामुळे जनता त्रासली आहे. केंद्र सरकारने त्यात लक्ष देऊन इंधनाचे दर कंट्रोल मध्ये ठेवले पाहिजेत, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढत्या महागाईवरून मोदी सरकारवर टीका केली आहे.

ही देशाच्या जनतेचं दुर्दैव

अजित पवार म्हणाले, “देशात प्रचंड महागाई वाढली आहे. गॅस डिझेल पेट्रोलचे भाव खूप वाढले आहेत. लोकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार बुडाले, अनेकांचे उद्योग अडचणीत आले आहेत. त्यासाठी लोकांनी आंदोलनं केली. पण केंद्र सरकार दखल घेताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दहा महिने होत आले. पण चर्चा होताना दिसत नाही. आता तर लोकसभेचं अधिवेशनही संपलं आता पुढच्या वर्षी अधिवेशनातच हा मुद्दा उपस्थित करता येईल. सध्या केंद्र सरकारची असलेली भूमिका ही देशाच्या जनतेचं दुर्दैव आहे”

सगळंच बंद करण्याची वेळ आणू नका

याशिवाय शाळा सुरु करण्याबाबत दोन मतप्रवाह आहेत. त्यानुसार दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचं काही लोक म्हणतात, तर दुसरा मतप्रवाह आहे तो म्हणजे शून्य टक्के रुग्ण आहे, तिथे शाळा सुरु करा. याबाबत मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतील, असंही अजित पवारांनी सांगतिलं.अजित पवार म्हणाले, ग्रामीण भागात लोक कोरोनायचे नियम पाळत नाही म्हणून ही वेळ आली आहे. पुन्हा सर्व बंद पाडण्याची निर्णय घेण्याची वेळ आणू नका. सगळंच बंद करण्याची वेळ आणू नका, असं अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांवर भडकले

काही लोक मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत. पण मंदिराचा मुद्दा हा राजकीय हेतूने आहे. केंद्र सरकारनेही सांगितलं आहे, खबरदारी घ्या, मग हे राजकारण कशासाठी असा सवाल अजित पवारांनी सांगितला.दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांवर भडकले. राज्य सहकारी बँकेवर EDची छापेमारी अशी बातमी मीडियात चालली. मात्र अशी कुठलीही घटना घडली नाही, असं अजित पवार म्हणाले.

बातम्या देताना काळजीपूर्वक द्या

धादांत खोट्या बातम्या आहेत, मात्र मी कायदेशीर कारवाई करणार नाही. मीडियाने विश्वासार्ह बातम्या द्याव्यात, लोकांचा आणि आमचा विश्वास उडत चालला आहे, असं अजित पवार म्हणाले.काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होतंय, फटका माझ्यासारख्याला बसतो. मी 40 वर्षे राजकारणात असून मंत्री म्हणून शपथ घेऊन जबाबदारीने बोलत असतो. शहानिशा न करता बातम्या दिल्या जातात हे दुर्दैवी आहे, असंही ते म्हणाले.राजू शेट्टी यांचा पत्ता कट आणि हेमंत टकले यांना संधी याही बातम्या कुठून येतात कळत नाही, त्यामुळे बातम्या देताना काळजीपूर्वक द्या, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरू नव्हतेच !

News Desk

‘पवारांना ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार नाही, त्यांच्यावर जनताच नाराज’, मुनगंटीवारांची टीका!

News Desk

सरकारकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे धनगर समाजाचा उद्रेक

News Desk