HW News Marathi
Covid-19

अजित पवार यांनी भगवान गौतम बुद्धांना अभिवादन करून सर्वांना दिल्या बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

मुंबई | भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या दया, क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाच्या विचारांमध्येच अखिल मानवजातीचे कल्याण सामावले आहे. हे विचारच मानवाचे जीवन अखंड प्रकाशमय करत राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगवान गौतम बुद्धांना अभिवादन केले असून सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान बुद्धांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन उपमुख्यमंत्री म्हणाले की, समाजातील दु:ख, अज्ञान, अन्याय, अहंकार दूर व्हावा यासाठी भगवान बुद्धांनी अलौकिक कार्य केले. अखिल मानवजातीला त्यांनी अहिंसेचा, दयेचा, करुणेचा संदेश दिला. आज जगावर कोरोनाचे संकट आले असताना अखिल मानवजातीला वाचवण्यासाठी एकत्र आणून सलोखा, सहकार्याचे वातावरण निर्माण करण्याची ताकद भगवान बुद्धांच्या विचारांमध्ये आहे. भावी पिढीला जगण्यासाठी आदर्श वातावरण देण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार मार्गदर्शक ठरतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे-शरद पवार यांची महापौर बंगल्यावर भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

News Desk

पुणे शहरातील कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी भाजपचे नगरसेवक, आमदारांसह खासदार आता होणार ‘चौकीदार’

News Desk

रामदेवबाबांनी ‘ती’ चूक केली मान्य,अॅलोपॅथीला म्हणाले होते ‘मूर्ख विज्ञान’

News Desk