HW News Marathi
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ‘या’ कारणामुळे नाराज?

मुंबई | राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. काल राज्यात दिवसभरात कोरोनाचे जवळपास ५९ हजार रुग्ण आढळून आले. तर ३५१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्याभरापासून १५ दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू आहे. पण त्याचा अपेक्षित परिणाम अद्याप तरी दिसलेला नाही. कोरोना रुग्णांच्या संख्येत फारशी घट झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आज (२० एप्रिल) राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होत आहे. एकूण स्थिती पाहता आणखी कडक निर्बंध की लॉकडाऊन करायचा? यावर आज चर्चा होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, राज्यात सध्या लागू असलेल्या निर्बंधांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याचं वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. राज्यात एकीकडे संचारबंदी लागू आहे. मात्र तरीही लोकांकडून निर्बंधांचं उल्लंघन करणे सुरूच आहे. कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. त्यामुळे अजित पवार सध्या लागू असलेल्या निर्बंधांवर नाराज असल्याचं समजत आहे. त्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे बोलून दाखवली आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार याबद्दल त्यांची भूमिका मांडतील अशी शक्यता आहे.

तर, राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा विचार असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांत निर्णय घेतील, असे मोठे आणि महत्त्वाचे विधान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. विजय वडेट्टीवार यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या दोन दिवसांत यासंबंधी निर्णय घेतील, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच, किराणा मालाच्या दुकानांची वेळ सध्या सकाळी ७ ते ११ केली आहे. ४ तास दुकाने सुरु ठेवण्याच्या निर्णयावर व्यापार नाराज आहेत. त्यामुळे या निर्णयावरही फेरविचार आजच्या बैठकीत होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हळूहळू संजय राऊत खरं बोलायला लागलेत पण…”, आशिष शेलारांचा टोला

News Desk

केवळ शेतकऱ्यांचे आंदोलन चाललंच पाहिजे, या हेतूने काही लोकं ते चालवण्याचा प्रयत्न करत – देवेंद्र फडणवीस 

News Desk

दबावतंत्र करायचं असेल तर शक्तीप्रदर्शनासाठी जागा पुरणार नाही, पंकजांचं सूचक वक्तव्य

News Desk