HW News Marathi
महाराष्ट्र

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन !

मुंबई | लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीशताब्दीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले असून लोकमान्य टिळकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा, सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून उभारलेली लोकचळवळ, त्यांचे राष्ट्रभक्तीचे विचार आपल्या सर्वांना देशासाठी काम करण्याची सदैव प्रेरणा देत राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकमान्य टिळकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

लोकमान्य टिळकांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, लोकमान्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्वं केलं. देशवासियांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करुन एकजूट करण्याचं मोठं काम त्यांनी केलं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना केली. देशासाठी तुरुंगवास भोगला. लोकमान्य टिळकांसारख्या देशभक्तांमुळे आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचं, स्वराज्याचं रुपांतर सुराज्यात करण्याचा आपण निर्धार करुया, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे. दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना साहित्यात स्थान, समाजात मान आणि व्यवहारात न्याय मिळवून देणारे अण्णाभाऊ थोर समाजसुधारक होते. लोककला, लोकसाहित्य, लोकजीवन, पुरोगामी, सुधारणावादी विचारांचे ते स्वतंत्र विद्यापीठ होते. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी देशासाठी, समाजासाठी दिलेल्या योगदानामुळे ते सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महान साहित्यिक होते. मानवतावादी लेखक होते. दुर्बल, वंचित, पिडीत, कष्टकरी बांधवांच्या जगण्याचं कष्टमय वास्तव त्यांनी साहित्यातून मांडलं. उपेक्षितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अण्णाभाऊंनी जीवनभर मानवतावादाचा, शोषणमुक्तीचा लढा लढला. देशाचा स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, गोवामुक्तीचा संग्राम, सामाजिक विषमतेविरुद्धची लढाई अशा अनेक संघर्षात आघाडीवर राहून भूमिका बजावली. राज्यात वैचारिक, सामाजिक, साहित्यिक क्रांती घडवण्याचं मोठं श्रेय लोकशाहीर अण्णाभाऊंना असल्याचं सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिल्लर खाऊन डॉलर पवारांकडे जमा करणाऱ्यालाच राष्ट्रवादी गृहमंत्रीपद देते!

News Desk

समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व समकक्ष पदांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय – धनंजय मुंडे

News Desk

महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी डौलाने उभारूया! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna