HW News Marathi
महाराष्ट्र

महाराजांमुळेच महाराष्ट्राला इतिहास, बाकी इतर प्रांतांना फक्त भुगोल! – संजय राऊत

मुंबई | “या मातीत जन्माला आले म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे. बाकी इतर प्रांतांना भुगोल आहे,” असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराजांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना खडेबोल सुनावले. राऊतांनी प्रसार माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप यांच्यात हिंदुत्वाच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोप केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची आज (२१ मार्च) जयंती आहे.

शिवजयंती यानिमित्ताने राऊत म्हणाले, “छत्रपती शिवाज महाराज या मातीत जन्म घेतला हे महत्वाचे आहे. आणि बाकी इतर राज्यांना केवळ भूगोल आहे. हे आपण विसरले नाही पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ज्यांना कोणाला राजकारण करायचे आहे. महाराजांचे व्यक्तिमत्व थोर आणि महान असून त्यांनी संपूर्ण देशाला दिशा दिली आहे.”

राऊत म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण महाराष्ट्राला रोजच होते असते. महाराजांनी ४०० वर्षापूर्वीच जो धडा शिकवला की, महाराष्ट्र शत्रूंसमोर झुकणार नाही आणि वाकणार नाही. महाराष्ट्र हा कायम स्वाभिमानासाठी, हक्कांसाठी, कष्टकऱ्यांसाठी आणि शत्रूसाठी लढत राहणार आहे. जो अंगावर येईल त्यांची बोटे छाटली जातील. जसा प्रतापगडावर अफजल खानाचा कोथळा निघाला  आणि २५ वर्षे लढून देखील औरंगजेबला महाराष्ट्रामध्येच मृत्यू झाला. हाच शिवचरित्राचा इतिहास महाराष्ट्र आणि देशाला माहिती आहे. हा धडा शिवसेना आणि महाराष्ट्राच्या शत्रूंनी लक्षात ठेवावा, असे ते म्हटले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका – अजित पवार

News Desk

दत्ता पडसलगीकर यांच्या सेवा मुदतवाढीविरोधात रिट याचिका दाखल

News Desk

औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग नागेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी

Aprna