HW News Marathi
महाराष्ट्र

“अदिती चांगलं काम करतेय, ती कमी पडली की तिचा बाप माझ्या डोक्यावर येऊन बसतो”- अजित पवार

श्रीवर्धन | श्रीवर्धनच्या विकासासाठी राज्य सरकारकडून 30 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी श्रीवर्धनमध्ये बोलताना अजित पवार यांनी अदिती तटकरे यांचं कौतुक केलं आहे. श्रीवर्धन बीच सुशोभिकरणाचा नारळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढवला. अदिती चांगलं काम करत आहे, ती कमी पडली की तिचा बाप माझ्या डोक्यावर येऊन बसतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यावरण राज्यमंत्री अदिती तटकरे यांचं कौतुक केलं आहे. अदिती तटकरे यांचे काम चांगले आहे, त्या जर कमी पडल्या तर त्यांचे वडील म्हणजेच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे कामं करुवून घेतात, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार आज रायगड-श्रीवर्धन दौऱ्यावर आहेत.

यावेळी अजित पवारांनी बोलताना अदिती अदिती माझी मुलगी, पै पै कामासाठी खर्च झाले पाहिजे, असा प्रेमळ दमही यावेळी त्यांनी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना दिला. ब्रिटिशांचं काम टिकतं आपलं का टिकत नाही, असा सवालही त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला आहे. अदिती तू मला बोलवलंस, पण काम चांगलं झालं पाहिजे, नाहीतर कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केल्याशिवाय राहणार नाही, हे आधीच सांगून ठेवतोय. मी स्पष्ट बोलतो, असं अजित पवार म्हणाले.

कोकणात पाच वर्षात चार वादळं

पाच वर्षात चार वादळं आली. सरकार पाठिशी आहे, केंद्र सरकारचे नियम लहान असतील तरी साडेतीनपट पैसे देण्याचं काम राज्याने केलं. कोरोना कसा अटॅक करेल सांगता येत नाही. नियम ठरवून दिल्याप्रमाणे पालन करण्याचं आपलं काम आहे. आतताईपणा जीवावर बेततोय, असं अजित पवारांनी सांगितलं.

100 वर्षांची झाडं पडली – अजित पवार

चक्रीवादळाने बाप-दादांनी लावलेली झाडं कोलमडून पडली. मात्र आता पावसाळ्यात चौपट झाडं लावा. 100 वर्षापूर्वीच्या झाडांसाठी हेरीटेज ट्री संकल्पना राबवा. ही झाडं तोडता येणार नाहीत, त्याला कायद्याचं संरक्षण असेल, असं अजित पवारांनी सांगितलं. वाऱ्याच्या वेगाला टिकणाऱ्या झाडांची वानवा आहे. लॅंडस्केपिंग करताना झाडांचा विचार व्हायला हवा. बीचवर गझीबो टेंट लावले जाणार, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

शरद पवारांनी अनेक वादळं पाहिली

शरद पवारांनी अनेक हल्ले , वादळं, दुष्काळ, गारपीट पाहिली, पण त्यातून न डगमगता राज्यातील जनतेला उभं करण्याचं काम केलं. ही भूमी ऐतिहासिक आहे. या भूमीला छत्रपतींचा वारसा आहे, महाडचं चवदार तळंही इथेच आहे. सी डी देशमुख, कान्होजी आंग्रेंचा इतिहास. त्यामुळे इथे आल्याचा आनंद आहे, रायगडावर सुवर्णतुला 4 जूनला झाली, आजचा दिवस महत्वाचा. 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, असं अजित पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साक्षीकडून माहीला अनोख्या शुभेच्छा

News Desk

निलोफर मलिक यांची देवेंद्र फडणवीसांना अब्रू नुकसानीची नोटीस!

News Desk

राणा दाम्पत्यांला दिलासा! मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

Aprna